शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

‘आधार’ची यंत्रणा खडबडली

By admin | Updated: August 24, 2015 03:02 IST

आधार कार्डमध्ये होणारा मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर आधार नोंदणीचे काम पाहणारी यंत्रणा खडबडून जागी झाली.

पिंपरी : आधार कार्डमध्ये होणारा मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर आधार नोंदणीचे काम पाहणारी यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांच्या एका पथकाने शहरातील सर्व महा ई-सेवा केंद्रांची पाहणी केली. तसेच तीन केंद्रचालकांना नोटीस पाठविल्या. अप्पर तहसीलदार किरण काकडे यांनी पहिल्यांदाच सर्वांची तातडीने बैठक घेतली. या वेळी बेकायदा काम करणाऱ्या केंद्रचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी इतर केंद्रचालकांनी केली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता काकडे यांची भंबेरी उडून गेली. ‘पत्रकारिता परमो धर्म’ या उपक्रमांतर्गत महास्टिंग आॅपरेशन करत ‘लोकमत’ने ‘आधार कार्डची चक्क विक्री’ या मथळ्याखाली १४ आॅगस्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये पिंपरी, आकुर्डी, दापोडी येथील केंद्रांमध्ये कशा पद्धतीने पैसे घेतले जातात, याचा छुप्या कॅमेऱ्याचा वापर करत भांडाफोड केला होता. यामुळे आधार नोंदणी पूर्ण मोफत आहे, आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास २५ रुपये शासकीय शुल्क आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेसमोर प्रथमच आली.आधार कार्डच्या वृत्तामुळे सर्व केंद्रचालकांमध्ये खळबळ उडाली. गैरव्यवहार करणाऱ्या चालकांनी केंद्र बंद ठेवणे पसंत केले. दरम्यान, अप्पर तहसीलदार किरण काकडे यांनी शनिवारी केंद्रचालकांची तातडीची बैठक बोलाविली. ‘लोकमत’च्या वृत्ताचा आधार घेत त्यांनी केंद्रचालकांना विचारणा केली. यासह आधार नोंदणीचे कामकाज पाहणाऱ्या खासगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. नियमानुसार काम करणाऱ्या चालकांनी ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्तावरून बैठकीत जोरदार मुद्दे उपस्थित केले. यामुळे चर्चा वादळी झाली. सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असते. सर्व कामकाजावर त्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील परिस्थिती वेगळीच आहे. येथील अप्पर तहसीलदार काकडे यांच्याकडेच अपुरी माहिती असल्याचे उघड झाले आहे. कारण या बैठकीत ते पूर्ण गोंधळून गेले होते. योजनेची पार्श्वभूमीच त्यांना माहिती नसल्याचे जाणवत होते. याबाबतची माहिती ते इतरांकडून घेत होते. पिंपरीतील कामगार भवनासमोरील, आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील. तसेच दापोडीतील मोरया रुग्णालयाशेजारील अशा तीन केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहेत. यासह त्यांच्या यंत्रांचे लॉगीनही बंद करण्यात आले आहे.आधारची किती नोंदणी झाली, नागरिकांना काय अडचणी येतात, कामकाज कशा पद्धतीने चालले आहे, यंत्रे किती आहेत याचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठका होणे आवश्यक आहे. व्यवस्थित नियोजन झाल्यास ही योजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होऊ शकेल. यासाठी यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीही तितकेच सक्षम असणे गरजेचे आहे. अधिकारी आहेत, मात्र त्यांनाच योजनेच्या कामकाजाबाबत पुरेपूर माहिती नाही, अशी परिस्थिती असल्यास नागरिकांकडून अशाच प्रकारे लूट सुरू राहील. आधार नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे घेणाऱ्या केंद्रचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र, या केंद्रांवर अंतिम कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)