शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकऱ्यांना मिळाली ८० लाखांची भरपाई

By admin | Updated: April 10, 2017 02:31 IST

जमिनीसाठी विकसन करारनामा करून बिल्डरने शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल्डरने पैसे

पिंपरी : जमिनीसाठी विकसन करारनामा करून बिल्डरने शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल्डरने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला. कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर तडजोड करण्याची तयारी बिल्डरने दाखविल्यामुळे दिवाणी न्यायालयाचा दावा पहिल्याच तारखेला निकाली निघाला. महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आलेल्या या खटल्यात दहा शेतकऱ्यांना संबंधित बिल्डरकडून ८० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.दिवाणी कोर्टात दाखल दावे निकाली निघण्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागते, असे म्हटले जाते. संबंधित शेतकऱ्यांकडून दिवाणी कोर्टात दाखल दावा दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळे निकाली निघाला.२०१४ मध्ये मोशी येथील दहा शेतकऱ्यांची जमीन भागीदारीमध्ये असलेल्या दोन बिल्डर्सतर्फे विकसनासाठी घेण्यात आली होती. त्यासाठी त्यांना साठ लाख रुपये मोबदला देण्याचे ठरले होते. संबंधित जागेचा विकसन करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे देण्यात आले नाहीत. बिल्डरकडून पैसे मिळण्यास उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी विकसन करारनामा  आणि कुलमुखत्यारपत्र रद्द  करण्यात यावे म्हणून दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी दावा दाखल केल्याचे समजल्यानंतर संबंधित बिल्डर्सकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यांचा हा दावा महालोकअदालतमध्ये निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यांनी महालोकअदालत मधील पॅनेलपुढे पैसे देण्याची तयारी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांतर्फे एस. बी. पवार, ऋषीकेश पवार यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांना ८० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.