शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

भोसरीतील ६ तरुणांना अटक

By admin | Updated: June 9, 2015 05:42 IST

रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली आहे.

चाकण : मुटकेवाडी ( ता. खेड ) येथे १ जून रोजी झालेल्या रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली असून आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, यातील चाकण मधील दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरार आहेत. हा खून किरकोळ भांडणाचा राग व जमीन खरेदी- विक्री व्यवसायातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव व उपनिरीक्षक अंकुश माने यांनी दिली. आरोपींकडून एक पिस्तुल, एक गावठी कट्टा व फरार आरोपींच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यातील चाकणमधील दोन मुख्य सुत्रधारासह ४ संशयित पळून गेले आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा उर्फ ज्ञानेश्वर फुलचंद तांदळे (वय २३), श्रीधर लक्ष्मण पवार (वय १९), निलेश नागराजन पिल्ले (वय ३२), शशिकांत पंडित जगताप (वय २६), स्वप्नील सावळाराम बोकड (वय २३), सतीश अर्जुन पाटील (वय २३, सर्व रा़ सदगुरुनगर, भोसरी ) यांना आज ( ता. ८ ) मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पिल्ले हा गोट्या धावडेच्या टोळीतील व अंकुश लांडगे खून प्रकरणातील आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. याबाबतची अधिक माहिती अशी कि, चाकणमधील मुटकेवाडी येथे सोमवारी (दि.१ जून ) रोजी सकाळी अकराच्या सुमारास रोहन राजेंद्र भूरूक याच्यावर दोघांनी गोळीबार करून खून केला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातूनच हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून पोलिसांनी लक्ष केंद्रित केलेले दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरारी झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करीत आहेत. सात दिवसात खुनाचा गुन्हा उघड करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळून भोसरीतून अटक केली. या दोन तपास पथकात वरील अधिकाऱ्यांसह सहायक निरीक्षक सतीश घोडघर, पोलिस हवालदार मिरगे, शरद माने, संतोष मोरे, मोरेश्वर इनामदार, पृथ्वी पाटील, सुभाष राउत, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, चंदू वाघ, दत्ता बनसोडे यांचा समावेश होता. (वार्ताहर)-------------पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र ते दोघे चाकण परिसरातून फरारी झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. हे दोन्ही प्रमुख सूत्रधार चाकण परिसरातील असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत. किरकोळ भांडण व जमीन खरेदी विक्रीच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे.