शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

वाहतूक नियोजनात २० खाती सहभागी

By admin | Updated: April 24, 2017 04:41 IST

वाहतूक नियोजन ही पुण्यातील सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. बाणेर येथे झालेल्या अपघातामुळे ही गरज आणखीच वाढली आहे.

वाहतूक नियोजन ही पुण्यातील सध्याची सर्वांत मोठी समस्या आहे. बाणेर येथे झालेल्या अपघातामुळे ही गरज आणखीच वाढली आहे. महापालिकेत वाहतूक नियोजनासाठी म्हणून स्वतंत्र प्रकल्प विभाग आहे. त्यांनी भविष्यातील अंदाज करून त्याप्रमाणे उड्डाणपूल, स्कायवॉक, मल्टिस्टेज पार्किंग असे उपाय राबवायचे असतात. वाहतूककोंडी होऊ नये, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे हा या विभागाच्या कामाचा प्रमुख उद्देश. खरेच त्याप्रमाणे काम होत आहे का, यावर या विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी टाकलेला प्रकाश...बोनाला म्हणाले, वाहतूक नियोजनात फक्त महापालिकेच्या प्रकल्प विभागाचाच नाही तर वेगवेगळ्या विभागातील तब्बल २० खात्यांचा सहभाग असतो. त्यांच्या परस्पर समन्वय व सहकार्यातून वाहतूक नियोजनाचे काम होत असते. असे असताना फक्त एकाच विभागावर त्याची जबाबदारी ढकलणे व त्यांच्यामुळे वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाला असे म्हणणे त्या खात्यावर अन्याय करणारे आहे.प्रकल्प विभाग प्लॅनिंग करत असतो. गेल्या २० वर्षांत शहरातील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा विचार करून अनेक उपाययोजना प्रकल्प विभागाने सुचवल्या आहेत. पे अ‍ॅण्ड पार्क हा त्यातीलच एक भाग आहे. पण खंत अशी आहे, की कोणालाही असे उपाय अमलात आणायचे नसतात, याचे कारण त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढणार असते. पे अ‍ॅण्ड पार्क प्रत्यक्षात आले नाही, त्यामुळे आज कोणीही कुठेही वाहन लावत आहे. त्याचा वाहतुकीला त्रास होतो. कोंडी निर्माण होते. याला प्रकल्प विभागच कारणीभूत आहे असे म्हणणे म्हणजे विषयाची माहिती नसणेच आहे.उड्डाणपूल हा वाहतुकीच्या नियंत्रणाचा एक भाग आहे. तोच अंतिम आहे असे नाही. तसेच या पुलांची बांधणीही वेगवेगळ्या विभागांमार्फत होत असते. त्यात राज्य सरकारच्या काही खात्यांचाही सहभाग आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने बांधलेल्या उड्डाणपुलात काहीही अयोग्य नाही. उलट या विभागाची कार्यक्षमता पाहून मेट्रो सारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही सोपवण्यात आले. ते पूर्ण केले व त्यावरच आता प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. तांत्रिक, प्रशासकीय तसेच व्यावसायिक अशा सर्व स्तरांवर प्रकल्प विभाग अव्वल आहे व वेळोवेळी ते सिद्ध झालेले आहे असा दावा बोनाला यांनी केला.अत्याधुनिक साधनांचा वापर करून निर्दोष काम करण्यासाठी पालिकेचा प्रकल्प विभाग प्रसिद्ध आहे असे स्पष्ट करून बोनाला म्हणाले, त्यामुळेच आमच्याकडे शहरातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सोपवण्यात आले. ते आम्ही उत्कृष्टपणे पूर्ण केले. स्काय वॉक, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग अशा अनेक कामांचे नियोजन प्रकल्प विभागाने केले आहे. प्रकल्प विभागाने पुढच्या काही वर्षांचे नियोजन केले आहे. अनेक उपाय सुचवले आहेत, मात्र त्या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. तो उभा करणे महापालिकेला अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे अशी कामे टप्पे तयार करून केली जातात. त्यामुळे दृश्य परिणाम दिसायला वेळ लागतो. त्याशिवाय अशा कोणत्याही नियोजनाला आपल्या व्यवस्थेत स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यांची मान्यता घ्यावी लागते. ज्या विभागांशी संबंधित काम आहे, त्या विभागांची शिफारस लागते. यात बराच कालावधी जातो. वाहनांची संख्या १ लाख गृहीत धरून केलेले नियोजन जर ती संख्या एकदम ५ लाख झाली तर कसे उपयोगी पडेल, असा प्रश्न बोनाला यांनी केला.सल्लागार एजन्सीच्या कामाचे स्वरूप वेगळे असते. मोठ्या प्रकल्पांसाठी सर्व्हे करणे, नकाशे तयार करणे, प्रकल्पबाधितांची माहिती जमा करणे ही कामे करावी लागतात. महापालिकेने ही कामे केली तर त्याला बराच काळ लागेल. सल्लागार संस्था ही कामे लगेच करतात, त्यामुळे त्यांची नियुक्ती करावी लागते. त्याला अवास्तव खर्च म्हणता येणार नाही. या कंपन्याही कोणा एकाच्या नाही तर संयुक्त मान्यतेने निश्चित केल्या जातात, असे बोनाला म्हणाले.