शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

कोरोनाच्या फस्यातही पीक कर्जासाठी येरझारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या ...

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेलादेखील बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या वर्षीची ६० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१-२२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १,२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील खासगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ५१ हजार ७०४ शेतकऱ्यांना २५६ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. कोरोना काळात संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला बँकांनी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज निर्माण झाली.

जिल्हा बँक पोहोचली ९९ टक्क्यांवर

परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी २५ जून पर्यंत या बँकांनी ७ हजार २४९ शेतकऱ्यांना ६९ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ ८ टक्के पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ ३३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार ७३० शेतकऱ्यांना ४० कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँके शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकेने आतापर्यंत ३९ हजार शेतकऱ्यांना १४२ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ९९.६१ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.