शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

कोरोनाच्या फस्यातही पीक कर्जासाठी येरझारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या ...

जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेलादेखील बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या वर्षीची ६० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१-२२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १,२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील खासगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ५१ हजार ७०४ शेतकऱ्यांना २५६ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. कोरोना काळात संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला बँकांनी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज निर्माण झाली.

जिल्हा बँक पोहोचली ९९ टक्क्यांवर

परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी २५ जून पर्यंत या बँकांनी ७ हजार २४९ शेतकऱ्यांना ६९ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ ८ टक्के पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ ३३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार ७३० शेतकऱ्यांना ४० कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँके शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकेने आतापर्यंत ३९ हजार शेतकऱ्यांना १४२ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ९९.६१ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.