शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

येलदरी दाखल झाले साडेपाच दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण ...

यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. जून आणि जुलै असे दोन महिने प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. सद्यस्थितीला या प्रकल्पामध्ये ७५.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मागील २२ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे प्रकल्पात नवीन पाणीसाठा दाखल झाला नव्हता. मात्र दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. मागील २५ तासांमध्ये या प्रकल्पात ५.७८ दलघमी पाण्याची आवक झाली असून प्रकल्पाच्या जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ही ७५.३४ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ग्रामस्थांना दिलासा सतर्कतेचा इशारा

या प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या प्रकल्पात सध्या ४१३ मीटर पाणी पातळी निर्माण झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ०.३७ मीटर पाणीपातळी शिल्लक आहे. दरम्यान हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात केव्हाही वाढ होऊन प्रकल्पातून पाणी सोडले जाऊ शकते. तेव्हा नदीपात्र शेजारील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असा इशारा हट्टा पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.