शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

सौरऊर्जा प्रकल्पाचे दोन वर्षांपासून रखडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST

येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या ...

येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे संबंधित विभागाने या जागेची पाहणी करून या ठिकाणी संरक्षक भिंतही बांधली. मात्र, त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ६ तासच वीज मिळत आहे.

महावितरण कंपनीकडून कृषी पंपासाठी देण्यात येणारी वीज ही अपुरी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाने जिंतूर तालुक्यातील म्हाळसा सावंगी येथील गायरान जमिनीमध्ये ५ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर २०१७मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सौर प्रकल्पासाठी सावंगी म्हाळसा येथील जागा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे महानिर्मिती कंपनीकडून पाठविण्यात आला. त्यानुसार शासनाकडून मराठवाडा विभागातील संभाव्य ५० मेगावॅट वीज निर्मितीपैकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सुरक्षा भिंतही बांधण्यात आली. त्याुमळे आगामी काळात येलदरी, सावंगी म्हाळसा व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होईल, त्याचबरोबर या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा पर्याय उपलब्ध होऊन शेतीतील उत्पादनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांंना होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.

केवळ ६ तास वीजपुरवठा

एकीकडे ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे सावंगी म्हाळसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीमध्ये घट जाणवत आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येलदरी व सावंगी म्हाळसा येथील ग्रामस्थांतून होत आहे.