शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पाचे दोन वर्षांपासून रखडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST

येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या ...

येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे संबंधित विभागाने या जागेची पाहणी करून या ठिकाणी संरक्षक भिंतही बांधली. मात्र, त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ६ तासच वीज मिळत आहे.

महावितरण कंपनीकडून कृषी पंपासाठी देण्यात येणारी वीज ही अपुरी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाने जिंतूर तालुक्यातील म्हाळसा सावंगी येथील गायरान जमिनीमध्ये ५ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर २०१७मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सौर प्रकल्पासाठी सावंगी म्हाळसा येथील जागा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे महानिर्मिती कंपनीकडून पाठविण्यात आला. त्यानुसार शासनाकडून मराठवाडा विभागातील संभाव्य ५० मेगावॅट वीज निर्मितीपैकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सुरक्षा भिंतही बांधण्यात आली. त्याुमळे आगामी काळात येलदरी, सावंगी म्हाळसा व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होईल, त्याचबरोबर या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा पर्याय उपलब्ध होऊन शेतीतील उत्पादनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांंना होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.

केवळ ६ तास वीजपुरवठा

एकीकडे ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे सावंगी म्हाळसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीमध्ये घट जाणवत आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येलदरी व सावंगी म्हाळसा येथील ग्रामस्थांतून होत आहे.