शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा ...

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा करताना दिसून येत आहेत. यामुळे या कनिष्ठ महाविद्यालय परिसरात सध्या रेलचेल वाढल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. काही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश आठ दिवसांच्या आतच फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दिसून येत आहे.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

कोरोनामुळे शहरी भागात आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे ते ग्रामीण भागात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरी भागात शिक्षणासाठी राहण्याचा खर्च कोरोनाकाळात परवडत नसल्यानेही अनेकांनी शहरात जाणे टाळले आहे.

ग्रामीण भागात सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयही गावाजवळच असल्याने जाण्या-येण्यासाठी सोपे होते, शिवाय खर्चात बचत होते. अकरावीसाठी गावाजवळ असलेल्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- किरण मुळे, नैकोटा, ता. सोनपेठ

कोविडमुळे विद्यार्थी शहरात जाण्यास तयार नाहीत. गावात राहूनच त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढला आहे. आमच्याकडे सर्व प्रवेश फुल्ल झाले आहेत.

- श्रीरंग राठोड, शारदा कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बाजार

वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षण असलेली ७०-३० टक्के प्रवेशप्रक्रिया रद्द झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात जाणारे विद्यार्थी गावातच अकरावीला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

- भगवानराव वटाणे, संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा बु.

ग्रामीण भागातही चांगले कॉलेजेस उपलब्ध झाले आहेत तसेच घराजवळ कॉलेज असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- सय्यद युनूस सय्यद शफी, महातपुरी, ता. गंगाखेड