शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा ...

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा करताना दिसून येत आहेत. यामुळे या कनिष्ठ महाविद्यालय परिसरात सध्या रेलचेल वाढल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. काही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश आठ दिवसांच्या आतच फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दिसून येत आहे.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

कोरोनामुळे शहरी भागात आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे ते ग्रामीण भागात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरी भागात शिक्षणासाठी राहण्याचा खर्च कोरोनाकाळात परवडत नसल्यानेही अनेकांनी शहरात जाणे टाळले आहे.

ग्रामीण भागात सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयही गावाजवळच असल्याने जाण्या-येण्यासाठी सोपे होते, शिवाय खर्चात बचत होते. अकरावीसाठी गावाजवळ असलेल्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- किरण मुळे, नैकोटा, ता. सोनपेठ

कोविडमुळे विद्यार्थी शहरात जाण्यास तयार नाहीत. गावात राहूनच त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढला आहे. आमच्याकडे सर्व प्रवेश फुल्ल झाले आहेत.

- श्रीरंग राठोड, शारदा कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बाजार

वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षण असलेली ७०-३० टक्के प्रवेशप्रक्रिया रद्द झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात जाणारे विद्यार्थी गावातच अकरावीला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

- भगवानराव वटाणे, संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा बु.

ग्रामीण भागातही चांगले कॉलेजेस उपलब्ध झाले आहेत तसेच घराजवळ कॉलेज असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- सय्यद युनूस सय्यद शफी, महातपुरी, ता. गंगाखेड