शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा ...

कोरोनामुळे यावर्षी दहावीचा निकाल जवळपास दीड महिना उशिराने लागला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ये-जा करताना दिसून येत आहेत. यामुळे या कनिष्ठ महाविद्यालय परिसरात सध्या रेलचेल वाढल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. काही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश आठ दिवसांच्या आतच फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दिसून येत आहे.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

कोरोनामुळे शहरी भागात आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे ते ग्रामीण भागात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरी भागात शिक्षणासाठी राहण्याचा खर्च कोरोनाकाळात परवडत नसल्यानेही अनेकांनी शहरात जाणे टाळले आहे.

ग्रामीण भागात सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाविद्यालयही गावाजवळच असल्याने जाण्या-येण्यासाठी सोपे होते, शिवाय खर्चात बचत होते. अकरावीसाठी गावाजवळ असलेल्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- किरण मुळे, नैकोटा, ता. सोनपेठ

कोविडमुळे विद्यार्थी शहरात जाण्यास तयार नाहीत. गावात राहूनच त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल वाढला आहे. आमच्याकडे सर्व प्रवेश फुल्ल झाले आहेत.

- श्रीरंग राठोड, शारदा कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव बाजार

वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षण असलेली ७०-३० टक्के प्रवेशप्रक्रिया रद्द झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात जाणारे विद्यार्थी गावातच अकरावीला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

- भगवानराव वटाणे, संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा बु.

ग्रामीण भागातही चांगले कॉलेजेस उपलब्ध झाले आहेत तसेच घराजवळ कॉलेज असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

- सय्यद युनूस सय्यद शफी, महातपुरी, ता. गंगाखेड