शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

उद्योगांचे चाक मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST

परभणी : संचारबंदी काळात कंपनी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली खरी; परंतु बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा ...

परभणी : संचारबंदी काळात कंपनी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली खरी; परंतु बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा कसा? असा प्रश्‍न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी उद्योग व्यवसाय ठप्प पडले असून उद्योजक मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडले आहेत.

संचारबंदी काळामध्ये उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असून या तीनही ठिकाणी कृषीवर आधारित कंपन्यांची संख्या अधिक आहे. संचारबंदीच्या काळात या कंपन्या अल्प मनुष्यबळावर सुरू ठेवण्यात आल्या ; परंतु दुसरीकडे उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ बंद असल्याने उद्योजक अडचणीत आहेत. त्यामुळे उत्पादन करून करायचे काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे. दुसऱ्या बाजूला उद्योग व्यवसाय सुरू करून त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते, वीजबिल भरणा करण्याएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. कंपनी सुरू करण्यासाठी कच्चा माल, स्पेअर पार्ट आदी साहित्य उपलब्ध होत नाही. मालवाहतूक बंद असल्याने उद्योग व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चही भागविणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यात उद्योग सुरू असले तरी या उद्योगांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मागील वर्षीच्या कोरोनाकाळात बसलेली आर्थिक झळ यावर्षी भरून निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे उद्योजकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी असली तरीही केवळ १० ते १५ टक्के उत्पन्न या काळात मिळत असल्याने उद्योजक मंडळी चांगलीच अडचणीत आली आहे.

कृषीवर आधारित उद्योगांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता शासनाने कर्जाचे हप्ते माफ करणे अपेक्षित आहे. उद्योग व्यवसायांना सावरण्यासाठी शासनाकडूनच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओमप्रकाश डागा, परभणी

कोरोना संसर्गकाळात शासनाने उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उद्योग सुरू ठेवला; परंतु कच्चा माल आणि इतर अडचणी आहेत. शिवाय, बाजारपेठ बंद असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बाहेती, सेलू

कोरोना संसर्गामुळे वाहतूक ठप्प असल्याने व्यवसाय बंद पडला आहे. मनुष्यबळ उपलब्ध असले तरी कामगारांचे पगारही निघत नाहीत. दोन महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आनंद भगत, परभणी