शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

सेलूत गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण ...

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

सेलू तालुक्यात रब्बी हंगामात ४८ हजार १९० हेक्टर जमिनीचे पेरणीलायक क्षेत्र आहे. रब्बी हंगामात प्रत्यक्षात ३० हजार ८८२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी करण्यात आलेली आहे. यामध्ये ६ हजार ९६५ हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला असून १५ हजार ६०९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. ८ हजार ९५ हेक्टरवर हरभरा पेरण्यात आला असून करडई १४५ हेक्टरवर पेरण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. गतवर्षी फक्त २ हजार १९० हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला होता. जो यावर्षी ६ हजार ९६५ हेक्टरवर झाला आहे. गतवर्षी ३४ हजार ७९० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी ज्वारीच्या पेऱ्यात घट झाला आहे. तालुक्यातील सिंचन विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांची स्थितीही समाधानकारक आहे. चिंतेची बाब म्हणजे तालुक्यात तुरीचे पीक पिवळे पडत आहे. शिवाय या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये कृषी निविष्ठांचा वापर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच करावा, अशा सचूना करण्यात येत आहेत.

तृणधान्य घटले; कडधान्य वाढले

गतवर्षी सेलू तालुक्यात ज्वारी, गहू, मका हे तृणधान्य ३७ हजार ७० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी मात्र हा पेरा २२ हजार ७०५ हेक्टरवर आला आहे. म्हणजेच जवळपास १४ हजार ३६५ हेक्टरची यामध्ये घट झाली आहे. गतवर्षी हरभरा व इतर कडधान्य ५ हजार ६८० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी ८ हजार ९५ हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. जवळपास २ हजार ४१५ हेक्टरची यामध्ये वाढ झाली आहे. याशिवाय करडई, जवस, सूर्यफूल आदी गळीत धान्य गतवर्षी ५ हजार ४४० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी फक्त २३७ हेक्टरवरच याची पेरणी करण्यात आली आहे. एकंदर शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धतेनुसार गहू व हरभरा आदी पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

तुरीचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घेऊन योग्य मात्रांची फवारणी करावी. सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहेत.

-आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलू