शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

सेलूत गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण ...

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

सेलू तालुक्यात रब्बी हंगामात ४८ हजार १९० हेक्टर जमिनीचे पेरणीलायक क्षेत्र आहे. रब्बी हंगामात प्रत्यक्षात ३० हजार ८८२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी करण्यात आलेली आहे. यामध्ये ६ हजार ९६५ हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला असून १५ हजार ६०९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. ८ हजार ९५ हेक्टरवर हरभरा पेरण्यात आला असून करडई १४५ हेक्टरवर पेरण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. गतवर्षी फक्त २ हजार १९० हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला होता. जो यावर्षी ६ हजार ९६५ हेक्टरवर झाला आहे. गतवर्षी ३४ हजार ७९० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी ज्वारीच्या पेऱ्यात घट झाला आहे. तालुक्यातील सिंचन विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांची स्थितीही समाधानकारक आहे. चिंतेची बाब म्हणजे तालुक्यात तुरीचे पीक पिवळे पडत आहे. शिवाय या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये कृषी निविष्ठांचा वापर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच करावा, अशा सचूना करण्यात येत आहेत.

तृणधान्य घटले; कडधान्य वाढले

गतवर्षी सेलू तालुक्यात ज्वारी, गहू, मका हे तृणधान्य ३७ हजार ७० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी मात्र हा पेरा २२ हजार ७०५ हेक्टरवर आला आहे. म्हणजेच जवळपास १४ हजार ३६५ हेक्टरची यामध्ये घट झाली आहे. गतवर्षी हरभरा व इतर कडधान्य ५ हजार ६८० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी ८ हजार ९५ हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. जवळपास २ हजार ४१५ हेक्टरची यामध्ये वाढ झाली आहे. याशिवाय करडई, जवस, सूर्यफूल आदी गळीत धान्य गतवर्षी ५ हजार ४४० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी फक्त २३७ हेक्टरवरच याची पेरणी करण्यात आली आहे. एकंदर शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धतेनुसार गहू व हरभरा आदी पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

तुरीचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घेऊन योग्य मात्रांची फवारणी करावी. सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहेत.

-आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलू