शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीच पाणी चोहिकडे

By admin | Updated: September 1, 2014 00:26 IST

परभणी: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील दोन दिवस परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

परभणी: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील दोन दिवस परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील जलसाठ्यात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे नदी-नाले एक झाले. गोदावरी नदी प्रवाही झाली. ढालेगाव, मुद्गल येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढला. निम्न दुधना प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. अपवाद आहे, तो येलदरी धरणाचा. येलदरी धरण मात्र तहानलेलेच आहे. सर्वत्र झालेल्या पावसामुळे पीक परिस्थितीत झपाट्याने बदल होत आहे. दोन दिवस जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. पाथरी तालुक्यात पावसाचे थैमानपाथरी : दोन दिवसांपासूून तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत राहिल्याने यावर्षी प्रथमच पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना पूर आला. रस्ते बंद पडले तर शहरातही अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. तर काही गावांमध्ये पुराचे पाणी घरात घुसल्याची घटना घडली. रेणापूर पुलाच्या दोन्ही बाजूने पाणी वाहिल्याने तब्बल ६ तास वाहतूक खोळंबली होती. २९ आॅगस्ट रोजी तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर तब्बल २४ तास संततधार पाऊस पडत राहिला. ३१ आॅगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस चालूच होता. या पावसामुळे मागील दोन दिवस जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. देवेगाव, खेर्डा येथील घरात पाणी घुसले तर वडी गावाच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. पाथरी शहरातील इंदिरानगरातील काही घरात पाणी शिरले. नदी- नाले तुडूंब भरुन वाहू लागल्याने दोन दिवस नागरिकांना गावाबाहेर पडताही आले नाही. ३१ आॅगस्ट रोजीच्या नोंदीप्रमाणे तालुक्यामध्ये ४७ मि.मी. पाऊस झाला. तर रविवारी दिवसभरात पडलेला पाऊस ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. तालुक्यात आतापर्यंत ३७७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. मुद्गल बंधाऱ्यात ५ टक्के पाणी वाढले तर ढालेगाव बंधाऱ्यात केवळ २ टक्के पाणीसाठा वाढला.वाघाळा येथील वार्ताहराने कळविले की, सततच्या पावसामुळे बाभळगाव महसूल मंडळातील लिंबा, मुद्गल, पिंपळगाव, विटा, फुलारवाडी या गावात पाणीच पाणी झाले होते. राज्य रस्ता क्रमांक ४४ वर वाहतूक ठप्प झाली होती.सोनपेठ तालुक्यात ५८ मिमी पाऊससोनपेठ : तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वदूर पाऊस झाला़ या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे़ पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंदी वातावरण आहे़ झालेल्या पावसाची नोंद सरासरी ५८ मिमी झाली आहे़ तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेत होता़ खरीप हंगामातील पीक पेरणीनंतर पाऊस झाला नाही़ त्यामुळे दुपारच्या उन्हात सोयाबीन हे पीक कोमेजून जाण्याच्या अवस्थेत दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे फिरकणे बंद केले होते़ कापूस व तूर या पिकांची वाढ खुंटली होती़ शेतकऱ्यांनी शेतातील अंतर मशागत पूर्ण करून बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला होता़ पाऊस येत नसल्याने बाजारपेठेतही त्याचा विपरित परिणाम झाला होता़ बाजारातील देणे-घेणेही बंद झाले होते़ दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते़ परंतु, गेल्या चोवीस तासांत सोनपेठ परिसरात ५६ मिमी तर तालुक्यातील आवलगाव परिसरात ६० मिमी पावसाची नोंद झाली़ पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात समाधानाचे वातवरण असून, कापूस पिकाला शेतकरी आता खत देण्यास सुरुवात करणार आहेत़ (वार्ताहर)रस्ता गेला वाहूनरेणापूर गावाजवळून जाणाऱ्या पुलाचे बांधकाम उंची वाढवून करण्यात आले. दोन्ही बाजूने ५०० मीटर भराव करण्यात आल्याने पुराचे पाणी पुलाच्या बाजूने गेल्याने वाहतूक सकाळी ११ वाजेपासून बंद राहिली. ५०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर पाणी पोहचले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेला रस्ता या पुलात वाहून गेला. पुरामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती माजी सरपंच शंतनू पाटील यांनी दिली. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीक्षमता १४.८७ दलघमी एवढी असून हा पाऊस पडण्यापूर्वी या बंधाऱ्यात १.५६ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता. तीन दिवसात ढालेगाव बंधाऱ्यात ४३.१७ टक्के पाणीसाठा वाढला. यामुळे या बंधाऱ्यात ७.७९ दलघमी पाणीसाठा झाला.तर मुद्गल बंधाऱ्यात ७.३८ टक्के वाढ झाली आहे.दुधना प्रकल्पात ४ टक्क्यांनी वाढसेलू : रविवारी पहाटे ४ वाजता सुरु झालेल्या संततधार पावसाने छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला तर कसुरा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहिली. सेलू- पाथरी मार्गावर बोरगावजवळ नाल्याला पूर आल्यामुळे काही काळ पाथरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर कसुरा नदीच्या पुलावरुन पाणी वाहिले. परभणी मार्गावरुन कसुरा नदी दुथडी भरुन वाहिल्यामुळे रविवारी उशिरा वाहतुकीची समस्या निर्माण झाली. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील ओढ्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. शहरातही दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान, दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत राहिल्याने जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. पावसामुळे अनेक बसफेऱ्या महामंडळाने रद्द केल्या तर काही ठिकाणी ओढ्यांना पूर आल्यामुळे बसफेऱ्यांवर परिणाम झाला. (प्रतिनिधी)दुधनात ४ टक्के पाणीवाढजालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात २४ तासांत तब्बल ४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात वेगाने जलसाठा झाला. दुधना प्रकल्पात रविवारी ५९ टक्के पाणीसाठा होता. त्यात ४१ टक्के जीवंत पाणीसाठा आहे. संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.