शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पावसाच्या खंडानंतरही प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST

जून आणि जुुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने ताण दिला. त्यामुळे या ...

जून आणि जुुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने ताण दिला. त्यामुळे या पंधरा दिवसांत प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होईल, असे वाटत होेते. बाष्पीभवन तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा वापर केल्यास पाणीसाठा घटण्याची शक्यता होती. मात्र असा कोणताही परिणाम या पाणीसाठ्यावर झालेला नाही.

जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्प सद्यस्थितीला १०० टक्के पाण्याने भरलेला आहे. या प्रकल्पात २४.९०० द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात १३.११२ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ४८ टक्के एवढी आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ७४.२५ टक्के, सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवर बांधलेल्या जिल्ह्यातील पाच बंधाऱ्यांपैकी ढालेगाव बंधाऱ्यात ७३ टक्के, मुदगल बंधाऱ्यात ७३ टक्के आणि डिग्रस बंधाऱ्यात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा लक्षात घेता, पावसाच्या खंडाचा या पाणीसाठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे.

प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा...

येलदरी : ६०१.२८६

निम्न दुधना : २००.१३७

करपरा : २४.९००

मासोळी : १३.११२

डिग्रस : ४३.५३

ढालेगाव : ९.९८

मुदगल : ८.३८