शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आठ दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST

साधारणत: वर्षभरापूर्वी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली; परंतु अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नवीन ...

साधारणत: वर्षभरापूर्वी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली; परंतु अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, तरीही पाण्याचे आवर्तन कमी झालेली नाही. शहरवासीयांना सद्य:स्थितीला ८ दिवसातून एक वेळा पाणी मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, हातपंपाचे पाणी आटले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महानगरपालिका प्रशासनाने किमान चार दिवसांतून एक वेळा शहराला पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ३ जलकुंभाच्या चाचणीचे काम दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. या कामासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर तरी शहरवासीयांना नियमित व मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.