शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

आठ हजार घरांना नव्या जलकुंभातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

परभणी : आठ वर्षांपासून रखडलेल्या राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मुख्य लाइनला जलकुंभ जोडला जात ...

परभणी : आठ वर्षांपासून रखडलेल्या राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मुख्य लाइनला जलकुंभ जोडला जात आहे. त्यामुळे या नवीन जलकुंभावरून सुमारे ८ हजार घरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

शहराचा विस्तार वाढल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांच होणारी ओढाताण लक्षात घेऊन यूआयडीएसएसएमटी योजनेतून नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र तरीही शहरवासीयांना १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच जुन्या जलवाहिनीमुळे पाण्याचे नियोजन करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील राजगोपालाचारी उद्यानात सुजल योजनेतून २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. तब्बल ८ वर्षांपासून रखडलेल्या या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, शनिवारपासून राहटी येथील रायझिंग लाइनचा पाणीपुरवठा जलकुंभाला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे राहटी जलकुंभावरून रामकृष्णनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, विष्णू जिनिंग परिसर, कल्याणनगर, शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागात साधारणत: ८ हजार घरे असून या घरांना थेट राजगोपालाचारी उद्यानातून पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे इतर जलकुंभावरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. पर्यायाने शहरवासीयांना चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

ममता कॉलनी जलकुंभावरील तीन झोन होणार कमी

शहरातील ममता कॉलनी जलकुंभावरून पूर्वी ७ झोनमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे प्रत्येक झोनला एक दिवस याप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी ७ दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना ७ दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा होत होता. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ कार्यान्वित झाल्यानंतर २२ लाख लिटर क्षमतेच्या ममता कॉलनी जलकुंभावर चार झोन शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे टचिंगचा भाग तसेच खंडोबा बाजार परिसरातील जलकुंभावरील पाण्याचा भारही कमी होणार आहे.

जोडणीच्या कामाला प्रारंभ

राजगोपालाचारी उद्यानातील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाला राहटी येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडणी करण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. या कामासाठी साधारणत: ६ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ६ प्रभागांमधील पाणीपुरवठा ठप्प होणार असला तरी त्यानंतर मात्र या प्रभागांमधील पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तन्वरी मिर्झा बेग यांनी दिली.