शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

आठ हजार घरांना नव्या जलकुंभातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

परभणी : आठ वर्षांपासून रखडलेल्या राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मुख्य लाइनला जलकुंभ जोडला जात ...

परभणी : आठ वर्षांपासून रखडलेल्या राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मुख्य लाइनला जलकुंभ जोडला जात आहे. त्यामुळे या नवीन जलकुंभावरून सुमारे ८ हजार घरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

शहराचा विस्तार वाढल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांच होणारी ओढाताण लक्षात घेऊन यूआयडीएसएसएमटी योजनेतून नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र तरीही शहरवासीयांना १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच जुन्या जलवाहिनीमुळे पाण्याचे नियोजन करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील राजगोपालाचारी उद्यानात सुजल योजनेतून २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. तब्बल ८ वर्षांपासून रखडलेल्या या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, शनिवारपासून राहटी येथील रायझिंग लाइनचा पाणीपुरवठा जलकुंभाला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे राहटी जलकुंभावरून रामकृष्णनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, विष्णू जिनिंग परिसर, कल्याणनगर, शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागात साधारणत: ८ हजार घरे असून या घरांना थेट राजगोपालाचारी उद्यानातून पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे इतर जलकुंभावरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. पर्यायाने शहरवासीयांना चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

ममता कॉलनी जलकुंभावरील तीन झोन होणार कमी

शहरातील ममता कॉलनी जलकुंभावरून पूर्वी ७ झोनमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे प्रत्येक झोनला एक दिवस याप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी ७ दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना ७ दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा होत होता. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ कार्यान्वित झाल्यानंतर २२ लाख लिटर क्षमतेच्या ममता कॉलनी जलकुंभावर चार झोन शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे टचिंगचा भाग तसेच खंडोबा बाजार परिसरातील जलकुंभावरील पाण्याचा भारही कमी होणार आहे.

जोडणीच्या कामाला प्रारंभ

राजगोपालाचारी उद्यानातील २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाला राहटी येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडणी करण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. या कामासाठी साधारणत: ६ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ६ प्रभागांमधील पाणीपुरवठा ठप्प होणार असला तरी त्यानंतर मात्र या प्रभागांमधील पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तन्वरी मिर्झा बेग यांनी दिली.