शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

रानभाज्यांतून मिळतात जीवनसत्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

परभणी, : नैसर्गिकरित्या शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्यांचा दररोजच्या जेवणामध्ये समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनसत्त्वे व खनिजांनी ...

परभणी, : नैसर्गिकरित्या शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्यांचा दररोजच्या जेवणामध्ये समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देवसरकर बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक एस. बी. आळसे, उपप्रकल्प संचालक के. आर. सराफ, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, विस्तार विद्यावेता गजानन गडदे आदी उपस्थित होते.

डॉ. देवसरकर म्हणाले, रानभाज्या या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. तसेच त्यांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. या महोत्सवात कर्टुली, टालका, पाथरा, हदगा, अळू, घोळ, तांदूळजा, भुई आवळा, कपाळफोडी, कुर्डू या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या, तर वाघाटे, करटुले, काशीफळ, करवंद, ड्रॅगनफ्रुट आदी रानफळांची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश इक्कर, प्रमोद रेंगे, विलास जोशी, शिवराज कदम, योगेश पवार, रवी माने, स्वाती घोडके आदींनी प्रयत्न केले.