शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

लोकसहभागातील गावतलावाने पाणीटंचाई केली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू ...

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई असायची. गावाला लागूनच कसुरा नदीचे पाणी पावसाळ्यात पुराने भरून निघून जायचे. परंतु, ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ यासारखे साधन नसल्याने या पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग होत नव्हता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सात-आठ नळ असून भूगर्भात पाणी नसल्याने ते कोरडे राहतात. गावातील महिलांना गावाजवळील शेतात विहीर किंवा बोअरवेलमधून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. २०२० पर्यंत गावामध्ये पाण्याची टंचाई गावाचा पाठ सोडत नव्हती. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘ग्रामविकास मंच’ नावाची चळवळ सुरू केली. गाव एक झालं, गावातील लोकांनी पाणी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लोकवर्गणी जमा केली. गावाजवळ पडीक सरकारी गायरान जमिनीवर ४० लाख लिटर क्षमतेचा गावतलाव तयार केला. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गावात येऊन गावकऱ्यांच्या कामाचं कौतुक केले व तरुणांचा उत्साह पाहून विकासकामासाठी हे गाव दत्तक घेतले. या गावात लांबून पाण्याची आवक असल्याने पहिल्याच पावसात शेततळे पूर्ण भरले. या शेततळ्याला लागूनच ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक विहीर खोदली गेली. शेततळ्याचे पाणी भूगर्भात जाऊन या विहिरीलासुद्धा पाणी लागले. ‘पाणीटंचाई असलेले गाव’ अशी अनेक वर्षे असलेली ओळख लोकसहभागातून उभारलेल्या गावतलावाने मिटविली.

कृषी विभागामार्फत ४० शेततळी

गावातील युवकांनी या गावतलावाला एक मॉडेल मानून म्हाळसापूर शिवारामध्ये एकाच वर्षात कृषी विभागामार्फत ४० शेततळी पूर्ण केले. तसेच गावामध्ये फळबाग लागवडसुद्धा वाढली. यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. या गावतलावामुळे गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजले व गावातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल

गावातील युवकांनी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली. तसेच एक लाख रुपये लोकवर्गणी जमा करून म्हाळसापूर-गोरेगाव या पांदण रस्त्याचे रूपांतर कच्च्या रस्त्यामध्ये केले. प्रशासनाकडून या कच्च्या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले. एकंदरीत माळसापूरमध्ये सामूहिक गावतलावापासून सुरू झालेली ही विकासाची घोडदौड चालूच आहे.