शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

लोकसहभागातील गावतलावाने पाणीटंचाई केली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू ...

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई असायची. गावाला लागूनच कसुरा नदीचे पाणी पावसाळ्यात पुराने भरून निघून जायचे. परंतु, ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ यासारखे साधन नसल्याने या पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग होत नव्हता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सात-आठ नळ असून भूगर्भात पाणी नसल्याने ते कोरडे राहतात. गावातील महिलांना गावाजवळील शेतात विहीर किंवा बोअरवेलमधून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. २०२० पर्यंत गावामध्ये पाण्याची टंचाई गावाचा पाठ सोडत नव्हती. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘ग्रामविकास मंच’ नावाची चळवळ सुरू केली. गाव एक झालं, गावातील लोकांनी पाणी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लोकवर्गणी जमा केली. गावाजवळ पडीक सरकारी गायरान जमिनीवर ४० लाख लिटर क्षमतेचा गावतलाव तयार केला. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गावात येऊन गावकऱ्यांच्या कामाचं कौतुक केले व तरुणांचा उत्साह पाहून विकासकामासाठी हे गाव दत्तक घेतले. या गावात लांबून पाण्याची आवक असल्याने पहिल्याच पावसात शेततळे पूर्ण भरले. या शेततळ्याला लागूनच ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक विहीर खोदली गेली. शेततळ्याचे पाणी भूगर्भात जाऊन या विहिरीलासुद्धा पाणी लागले. ‘पाणीटंचाई असलेले गाव’ अशी अनेक वर्षे असलेली ओळख लोकसहभागातून उभारलेल्या गावतलावाने मिटविली.

कृषी विभागामार्फत ४० शेततळी

गावातील युवकांनी या गावतलावाला एक मॉडेल मानून म्हाळसापूर शिवारामध्ये एकाच वर्षात कृषी विभागामार्फत ४० शेततळी पूर्ण केले. तसेच गावामध्ये फळबाग लागवडसुद्धा वाढली. यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. या गावतलावामुळे गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजले व गावातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल

गावातील युवकांनी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली. तसेच एक लाख रुपये लोकवर्गणी जमा करून म्हाळसापूर-गोरेगाव या पांदण रस्त्याचे रूपांतर कच्च्या रस्त्यामध्ये केले. प्रशासनाकडून या कच्च्या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले. एकंदरीत माळसापूरमध्ये सामूहिक गावतलावापासून सुरू झालेली ही विकासाची घोडदौड चालूच आहे.