शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लोकसहभागातील गावतलावाने पाणीटंचाई केली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू ...

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई असायची. गावाला लागूनच कसुरा नदीचे पाणी पावसाळ्यात पुराने भरून निघून जायचे. परंतु, ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ यासारखे साधन नसल्याने या पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग होत नव्हता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सात-आठ नळ असून भूगर्भात पाणी नसल्याने ते कोरडे राहतात. गावातील महिलांना गावाजवळील शेतात विहीर किंवा बोअरवेलमधून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. २०२० पर्यंत गावामध्ये पाण्याची टंचाई गावाचा पाठ सोडत नव्हती. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘ग्रामविकास मंच’ नावाची चळवळ सुरू केली. गाव एक झालं, गावातील लोकांनी पाणी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लोकवर्गणी जमा केली. गावाजवळ पडीक सरकारी गायरान जमिनीवर ४० लाख लिटर क्षमतेचा गावतलाव तयार केला. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गावात येऊन गावकऱ्यांच्या कामाचं कौतुक केले व तरुणांचा उत्साह पाहून विकासकामासाठी हे गाव दत्तक घेतले. या गावात लांबून पाण्याची आवक असल्याने पहिल्याच पावसात शेततळे पूर्ण भरले. या शेततळ्याला लागूनच ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक विहीर खोदली गेली. शेततळ्याचे पाणी भूगर्भात जाऊन या विहिरीलासुद्धा पाणी लागले. ‘पाणीटंचाई असलेले गाव’ अशी अनेक वर्षे असलेली ओळख लोकसहभागातून उभारलेल्या गावतलावाने मिटविली.

कृषी विभागामार्फत ४० शेततळी

गावातील युवकांनी या गावतलावाला एक मॉडेल मानून म्हाळसापूर शिवारामध्ये एकाच वर्षात कृषी विभागामार्फत ४० शेततळी पूर्ण केले. तसेच गावामध्ये फळबाग लागवडसुद्धा वाढली. यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. या गावतलावामुळे गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजले व गावातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल

गावातील युवकांनी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली. तसेच एक लाख रुपये लोकवर्गणी जमा करून म्हाळसापूर-गोरेगाव या पांदण रस्त्याचे रूपांतर कच्च्या रस्त्यामध्ये केले. प्रशासनाकडून या कच्च्या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले. एकंदरीत माळसापूरमध्ये सामूहिक गावतलावापासून सुरू झालेली ही विकासाची घोडदौड चालूच आहे.