शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातील गावतलावाने पाणीटंचाई केली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू ...

म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई असायची. गावाला लागूनच कसुरा नदीचे पाणी पावसाळ्यात पुराने भरून निघून जायचे. परंतु, ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ यासारखे साधन नसल्याने या पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग होत नव्हता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सात-आठ नळ असून भूगर्भात पाणी नसल्याने ते कोरडे राहतात. गावातील महिलांना गावाजवळील शेतात विहीर किंवा बोअरवेलमधून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. २०२० पर्यंत गावामध्ये पाण्याची टंचाई गावाचा पाठ सोडत नव्हती. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘ग्रामविकास मंच’ नावाची चळवळ सुरू केली. गाव एक झालं, गावातील लोकांनी पाणी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लोकवर्गणी जमा केली. गावाजवळ पडीक सरकारी गायरान जमिनीवर ४० लाख लिटर क्षमतेचा गावतलाव तयार केला. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गावात येऊन गावकऱ्यांच्या कामाचं कौतुक केले व तरुणांचा उत्साह पाहून विकासकामासाठी हे गाव दत्तक घेतले. या गावात लांबून पाण्याची आवक असल्याने पहिल्याच पावसात शेततळे पूर्ण भरले. या शेततळ्याला लागूनच ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक विहीर खोदली गेली. शेततळ्याचे पाणी भूगर्भात जाऊन या विहिरीलासुद्धा पाणी लागले. ‘पाणीटंचाई असलेले गाव’ अशी अनेक वर्षे असलेली ओळख लोकसहभागातून उभारलेल्या गावतलावाने मिटविली.

कृषी विभागामार्फत ४० शेततळी

गावातील युवकांनी या गावतलावाला एक मॉडेल मानून म्हाळसापूर शिवारामध्ये एकाच वर्षात कृषी विभागामार्फत ४० शेततळी पूर्ण केले. तसेच गावामध्ये फळबाग लागवडसुद्धा वाढली. यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. या गावतलावामुळे गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजले व गावातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल

गावातील युवकांनी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली. तसेच एक लाख रुपये लोकवर्गणी जमा करून म्हाळसापूर-गोरेगाव या पांदण रस्त्याचे रूपांतर कच्च्या रस्त्यामध्ये केले. प्रशासनाकडून या कच्च्या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले. एकंदरीत माळसापूरमध्ये सामूहिक गावतलावापासून सुरू झालेली ही विकासाची घोडदौड चालूच आहे.