शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी पक्षांसह विविध संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

परभणी : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये ...

परभणी : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विविध कामगार संघटना, शेतकरी संघटना एकवटल्या असून, मंगळवारचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले ३ कायदे शेतकरी विरोधी असल्याने या कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे १५ राज्यांतील लाखो शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे पाळला जाणार आहे. या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष-संघटनांबरोबरच सामाजिक संघटना आणि कामगार, शेतकरी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. एकता हमाल मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. सर्व हमाल, कामगार ८ डिसेंबर रोजी काम बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. रोहिदास नेटके, शेषराव सावळे, विश्वनाथ कसबे, नवनाथ उफाडे, लिंबाजी कांबळे, बालाजी सावळे, दिगंबर काकडे, भारत कांबळे, गजानन कांबळे आदींनी कळविले आहे. त्याचप्रमाणे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ॲड. सुरेश माने, जय हो बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बहुजन क्रांती मोर्चा आदीं संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांसाठीचा बंद ऐतिहासिक राहील

आतापर्यंत देशात अनेक आंदोलने झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी पुकारलेला हा बंद ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. नागरिकांनी आपल्या अन्नदात्यासाठी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन खा. बंडू जाधव, आ. सुरेश वरपूडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. शेतमालाला हमीभाव देण्याची हमी केंद्र शासनाच्या कायद्यात नाही. त्यामुळे उद्योजकांचे भले होणार असून, शेतकरी भरडला जाणार असल्याने या कायद्याला विरोध आहे. दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनास काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्यभर सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. याच शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या देशव्यापी बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आ. वरपूडकर यांनी केले. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजन क्षीरसागर, राकाँचे दादासाहेब टेंगसे, माणिक कदम, व्यापारी महासंघाचे सचिन अंबिलवादे, माजी सभापती रवि सोनकांबळे, प्रा. तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.