शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

सत्ताधारी पक्षांसह विविध संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

परभणी : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये ...

परभणी : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विविध कामगार संघटना, शेतकरी संघटना एकवटल्या असून, मंगळवारचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले ३ कायदे शेतकरी विरोधी असल्याने या कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे १५ राज्यांतील लाखो शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे पाळला जाणार आहे. या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष-संघटनांबरोबरच सामाजिक संघटना आणि कामगार, शेतकरी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. एकता हमाल मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. सर्व हमाल, कामगार ८ डिसेंबर रोजी काम बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. रोहिदास नेटके, शेषराव सावळे, विश्वनाथ कसबे, नवनाथ उफाडे, लिंबाजी कांबळे, बालाजी सावळे, दिगंबर काकडे, भारत कांबळे, गजानन कांबळे आदींनी कळविले आहे. त्याचप्रमाणे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ॲड. सुरेश माने, जय हो बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बहुजन क्रांती मोर्चा आदीं संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांसाठीचा बंद ऐतिहासिक राहील

आतापर्यंत देशात अनेक आंदोलने झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी पुकारलेला हा बंद ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. नागरिकांनी आपल्या अन्नदात्यासाठी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन खा. बंडू जाधव, आ. सुरेश वरपूडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. शेतमालाला हमीभाव देण्याची हमी केंद्र शासनाच्या कायद्यात नाही. त्यामुळे उद्योजकांचे भले होणार असून, शेतकरी भरडला जाणार असल्याने या कायद्याला विरोध आहे. दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनास काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्यभर सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. याच शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या देशव्यापी बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आ. वरपूडकर यांनी केले. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजन क्षीरसागर, राकाँचे दादासाहेब टेंगसे, माणिक कदम, व्यापारी महासंघाचे सचिन अंबिलवादे, माजी सभापती रवि सोनकांबळे, प्रा. तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.