शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकानंतर शिर्शी पूल पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

सोनपेठ: तालुक्यातील गोदावरी नदीवर शिर्शी येथे १९९९ पासून उभारण्यात येणारा पूल दोन दशकानंतर पूर्णत्वाकडे गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना ...

सोनपेठ: तालुक्यातील गोदावरी नदीवर शिर्शी येथे १९९९ पासून उभारण्यात येणारा पूल दोन दशकानंतर पूर्णत्वाकडे गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ होणार असून सोनपेठ ते परभणी अंतर कमी होणार आहे.

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला सोनपेठ तालुका नेहमीच रस्त्यसाठी चर्चेत असतो. तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी ५९ दिवस साखळी उपोषण केले होते. मात्र तरीही रस्त्यांच्या दर्जात कोणतीही सुधारणा झालेली नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील शिर्शी येथे गोदावरी नदीवर पूल उभारणीसाठी १९९९ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर येथील पुलाचे काम सुरु करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आल्यानंतर पुन्हा ते बंद पडले. संबंधित गुत्तेदाराने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिले. त्यानंतर २०१३ मध्ये या पुलाच्या कामासाठी फेर निविदा काढण्यात आली. त्यासाठी १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर सुरु झालेल्या कामावर ८ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च झाला. मंदगतीने सुरु असलेल्या या पुलाचे काम १९९ मध्ये सुरु झाले अन्‌ २०२१ मध्ये पूर्णत्वाकडे गेले. या पुलाचा तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सोनपेठ तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी यापूर्वी गंगाखेड किंवा पाथरीमार्गे परभणी येथे जावे लागत होते. यासाठी जवळपास ९० कि.मी.चा फेरा मारुन हे अंतर पार करावे लागत होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता; परंतु, आता शिर्शी पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे ५५ कि.मी.ने अंतर कमी होऊन जिल्ह्याचे मुख्यालय गाठता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.

बीड, हिंगोलीचे अंतर होणार कमी

परभणी येथून बीड येथे जाण्यासाठी शिर्शी मार्गाने अंतर कमी होणार आहे. परभणी येथून पाथरी मार्गाने बीडला जाण्यासाठी १४० कि.मी.चे अंतर आहे. तर परभणी-सोनपेठमार्गे १३० कि.मी.चे अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे शिर्शी मार्गाने १० कि.मी.ने अंतर वाचणार आहे. परिणामी या शिर्शी पुलामुळे बीडचे अंतर कमी होणार आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व हिंगोलीकडे जाण्यासाठी सोनपेठ येथील नागरिकांना पाथरी किंवा गंगाखेडमार्गाने जावे लागत होतेे. मात्र या पुलामुळे ५० कि.मी.अंतर कमी होणार आहे.

परभणी-शिर्शी - सोनपेठ या मार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. शिर्शी गावातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे.

-संजय बडे, उपअभियंता सां.बा.