शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ...

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत तयारी केली नाही. मात्र बारावी इयत्तेत असताना ठरावीक ध्येय समोर ठेवून तयारी केली. तसेच अकरावी परीक्षेसह काही विद्यार्थ्यांनी महत्त्व दिलेले नसते. या विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे निकालाचे सूत्र चिंता वाढविणारे ठरत आहे.

.....................

अकरावीची परीक्षा आम्ही गांभीर्याने घेतली नव्हती; त्यामुळे शासनाच्या धोरणाचा निकालावर परिणाम होऊ शकतो. तसेच हा निर्णय घेतानाही खूप उशीर केला. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी शासनाने निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे.

- कलश अग्रवाल, विद्यार्थी

दोन वर्षांपासून लाॅकडाऊनच आहे. अकरावीच्या परीक्षेचे गुणही असे इमॅजनरी आहेत. त्यामुळे माझा अकरावीचा स्कोअर खूपच कमी आला. अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याने चिंता वाटते.

- खुशी दोषी, विद्यार्थिनी

बारावीच्या परीक्षेसाठी दहावीचे गुण ग्राह्य धरण्याचे सूत्र योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक विद्यार्थ्यांनीही तसे बोलून दाखविले आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे काही विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी चिंता न करता पुढील परीक्षेवर फोकस करावा.

- संदीप जैस्वाल

कोविडच्या संसर्गामुळे बारावी परीक्षेत गुणदानाचे सूत्र निश्चित झाले आहे. यात काही विद्यार्थी निश्चितच चिंतेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी अधिक चिंता न करता पुढील परीक्षांची जोमाने तयारी करावी. त्यांच्या करिअरवर अधिक भर द्यावा.

-प्रा. व्ही. बी. गायकवाड