शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ...

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत तयारी केली नाही. मात्र बारावी इयत्तेत असताना ठरावीक ध्येय समोर ठेवून तयारी केली. तसेच अकरावी परीक्षेसह काही विद्यार्थ्यांनी महत्त्व दिलेले नसते. या विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे निकालाचे सूत्र चिंता वाढविणारे ठरत आहे.

.....................

अकरावीची परीक्षा आम्ही गांभीर्याने घेतली नव्हती; त्यामुळे शासनाच्या धोरणाचा निकालावर परिणाम होऊ शकतो. तसेच हा निर्णय घेतानाही खूप उशीर केला. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी शासनाने निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे.

- कलश अग्रवाल, विद्यार्थी

दोन वर्षांपासून लाॅकडाऊनच आहे. अकरावीच्या परीक्षेचे गुणही असे इमॅजनरी आहेत. त्यामुळे माझा अकरावीचा स्कोअर खूपच कमी आला. अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याने चिंता वाटते.

- खुशी दोषी, विद्यार्थिनी

बारावीच्या परीक्षेसाठी दहावीचे गुण ग्राह्य धरण्याचे सूत्र योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक विद्यार्थ्यांनीही तसे बोलून दाखविले आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे काही विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी चिंता न करता पुढील परीक्षेवर फोकस करावा.

- संदीप जैस्वाल

कोविडच्या संसर्गामुळे बारावी परीक्षेत गुणदानाचे सूत्र निश्चित झाले आहे. यात काही विद्यार्थी निश्चितच चिंतेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी अधिक चिंता न करता पुढील परीक्षांची जोमाने तयारी करावी. त्यांच्या करिअरवर अधिक भर द्यावा.

-प्रा. व्ही. बी. गायकवाड