शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ...

बारावी परीक्षेचा निकाल घोषित करण्यासाठी दहावी आणि अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत तयारी केली नाही. मात्र बारावी इयत्तेत असताना ठरावीक ध्येय समोर ठेवून तयारी केली. तसेच अकरावी परीक्षेसह काही विद्यार्थ्यांनी महत्त्व दिलेले नसते. या विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे निकालाचे सूत्र चिंता वाढविणारे ठरत आहे.

.....................

अकरावीची परीक्षा आम्ही गांभीर्याने घेतली नव्हती; त्यामुळे शासनाच्या धोरणाचा निकालावर परिणाम होऊ शकतो. तसेच हा निर्णय घेतानाही खूप उशीर केला. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी शासनाने निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे.

- कलश अग्रवाल, विद्यार्थी

दोन वर्षांपासून लाॅकडाऊनच आहे. अकरावीच्या परीक्षेचे गुणही असे इमॅजनरी आहेत. त्यामुळे माझा अकरावीचा स्कोअर खूपच कमी आला. अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याने चिंता वाटते.

- खुशी दोषी, विद्यार्थिनी

बारावीच्या परीक्षेसाठी दहावीचे गुण ग्राह्य धरण्याचे सूत्र योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक विद्यार्थ्यांनीही तसे बोलून दाखविले आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे काही विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी चिंता न करता पुढील परीक्षेवर फोकस करावा.

- संदीप जैस्वाल

कोविडच्या संसर्गामुळे बारावी परीक्षेत गुणदानाचे सूत्र निश्चित झाले आहे. यात काही विद्यार्थी निश्चितच चिंतेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी अधिक चिंता न करता पुढील परीक्षांची जोमाने तयारी करावी. त्यांच्या करिअरवर अधिक भर द्यावा.

-प्रा. व्ही. बी. गायकवाड