शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नियम डावलत बाजारपेठेत तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असून, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी नियम डावलत बाजारपेठेत मोठी ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असून, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी नियम डावलत बाजारपेठेत मोठी गर्दी केली. त्यामुळे तब्बल तीन ते चार तास या भागातील वाहतूक ठप्प राहिली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. राज्य शासनाच्या अनलॉकच्या प्रक्रियेत परभणी जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात असल्याने सोमवार ते शुक्रवारपर्यंत बाजारपेठेतील सर्व व्यवहार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी येथील बाजारपेठेत सकाळी दहा वाजेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी इतर दुकाने दुकानांवर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. या काळात फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर या कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क जनता मार्केट, कच्छी बाजार, नानलपेठ या परिसरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.

सायंकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. एकीकडे हा उत्साह समाधान देणारा असला तरी दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. बाजारपेठ सुरू झाली असली तरी प्रतिबंधक नियमांचे पालन करायचे आहे, ही बाब विस्मरणात गेली की काय? असे चित्र निर्माण झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी केली तर कोरोना संसर्ग कमी होणार कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

जागोजागी वाहतूक ठप्प

अनलॉक झाल्याने बाजारपेठेतील व्यवहार खुले झाले असले तरी ग्राहकांच्या गर्दीमुळे रस्ते मात्र लॉक झाल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले. शहरातील जनता मार्केट, कच्छी बाजार या भागात एकेरी वाहतुकीचे मार्ग आहेत. या रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी झाल्याने तब्बल तीन तासांपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. अशीच परिस्थिती गांधी पार्क, नारायणचाळ रोड, स्टेशन रोड, नवा मोंढा, ग्रँड कॉर्नर या भागातही निर्माण झाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली.

मनपाकडून कारवाई

कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पथकांची स्थापना केली आहे. रविवारपर्यंत या पथकाने शहरात ठिकठिकाणी कारवाई केली. सोमवारी सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक कारवाई कडक स्वरूपात होणे आवश्यक होते ; परंतु सोमवारी या पथकांकडून कुठेही कारवाई झाली नाही.