शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

परभणी :सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ ...

परभणी :सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी तर काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत ७ हजार ०१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र या कंपनीने केवळ १८ हजार ९०४ शेतकऱ्यांना ११ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली. त्यामुळे यावर्षीही हजारो शेतकऱ्यांना विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षताच दिल्याचे दिसून येत आहे.

२०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांचा पेरा केला होता. नैसर्गिक संकटाच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला. त्यापोटी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांच्या विमा हप्त्याची रक्कम कंपनीकडे भरली होती. यामध्ये सर्वाधिक ३ लाख १६ हजार ९६६ शेतकऱ्यांनी २ लाख ४० हजार ३३ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, १ लाख २४ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ४५ हजार ८१४ हेक्टरवरील तूर व ५९ हजार ६८४ शेतकऱ्यांनी २३ हजार ६६७ हेक्टरवरील कापूस पिकाचा विमा उतरविला होता. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्व सूचना कंपनीकडे केली होती. त्याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीच्या ७ हजार शेतकऱ्यांनी नोंदी कंपनीकडे केल्या होत्या. मात्र या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे नुकसानीच्या तक्रारी करूनही २७ हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने मदत नाकारली आहे. त्यामुळे या विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षताच दिल्या आहेत.

केवळ ७२ तासांत नोंदणी न केल्याचे दाखविले जाते कारण

२०२०-२०२१ या खरीप हंगामात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ७ लाख शेतकऱ्यांनी विमा भरून पिके संरक्षित केली आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस पीक हातचे गेले आहे. मात्र या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आता ऑनलाईनच्या माध्यमातून तक्रार दाखल केली नसल्याचे कारण देत विमा कंपनीकडून ७ लाख शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मदत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने फसविले आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांचा प्रीमियम भरला. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरली. तरी सुद्धा नुकसान होऊन विमा कंपनी मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कंपनीच्या मालकाच्या घराबाहेर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.

माणिक कदम, शेतकरी