शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

फिल्डवरील कर्मचाऱ्याचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

पाथरी : रेणुका शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना ...

पाथरी : रेणुका शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना प्रशासनाने फिल्डवर सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेच्या मनमानी कारभारात फिल्डवरील कर्मचाऱ्याची पाठराखण प्रशासनाकडून केली जात होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत होती. कारखाना सुरू होऊन ६४ दिवस उलटले आहेत. या काळात ऊस तोडणीसाठी ठरवून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याने एकाला तोड चिठ्ठी आणि दुसऱ्याच्या शेतातील ऊस तोडणीचा प्रकार सातत्याने मागील काही दिवसांपासून उघड होत होता. त्यामुळे ऊस उत्पादकांतून कारखाना प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट न थांबविल्यास ६ जानेवारी रोजी काटाबंद करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाकडून तोडणी आणि वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारखाना प्रशासनाने फिल्डवरील कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एकाचे निलंबन करून प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

युनिट हेड आणि पथकाकडून तक्रारीची शहानिशा

कारखाना तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कारखाना युनिट हेड आणि इतर अधिकाऱ्यांमार्फत उसाच्या फडात जाऊन थेट सर्वेक्षण केले जात आहे. यात एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.

फिल्डवर काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला दोषी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणावरून हटविण्यात यावे, तसेच यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, यासाठी ६ जानेवारी रोजी काटा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आ. बाबाजानी दुर्राणी