शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सव्वाशे हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

जिंतूर : यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार आतापर्यंत सव्वाशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. ...

जिंतूर : यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार आतापर्यंत सव्वाशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्याच बरोबर उपलब्ध पाण्याचा उपयोग घेण्यासाठी ४ हजार हेक्टरवर भुईमुगाचाही पेरा केला असल्याचे तालुका कृषी विभागाच्या अहवालातन नमूद करण्यात आले आहे.

गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ३३ हजार ९६७ हेक्टरवर ४० हजार ११२ शेतकऱ्यांनी पेरणी केलल्या सोयाबीन, कापूस, उडीद या पिकांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याच बरोबर सोयाबीन कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटे व बियाणे कंपन्यांच्या फसवणुकीमुळे आर्थिक कोंडीत सापडला. आगामी खरीप हंगामात तरी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांची कमतरता भासू नये, त्याच बरोबर बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या पदरी पडू नये, यासाठी जिल्हा व तालुका कृषी विभाग जानेवारी महिन्यापासूनच कामाला लागला आहे. तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग करून उन्हाळी सोयाबीनची पेरणी बीजोत्पादनासाठी करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत हंगाम नसतानाही सव्वाशे हेक्टरवर सोयाबीनची बीजोत्पादनासाठी पेरणी केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी एस.पी. काळे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अंगलगाव, ब्राह्मणगाव, अकोली, नागठाणा, वरूड, निलज व अंबरवाडी या गावांमध्ये सर्वाधिक उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.

चार हजार हेक्टरवर भुईमूग

जिंतूर तालुक्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४ हजार हेक्टरवर भुईमुगाचा पेरा केला आहे. त्यामुळे या भुईमुगातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर शेतकरी आता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नानाजी देशमुख, कृषी संजीवनी योजनेंतर्गत नियंत्रित शेती करण्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.