शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन ...

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण झाले असून यावर्षी ५४१ हेक्टरवर उसाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात झाली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रब्बी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी देखील पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने पिके देखील जोमात आली होती. मात्र सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या वातावरण बदलाचा फटका या पिकांना बसला. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव, धरणे

ओसंडून वाहू लागली. या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, अशी अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांनी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने देखील रब्बीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीक पद्धतीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २९० हेक्टरवर ऊस, हरभरा, ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.

हरभरा व उसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अतिवृष्टीचा पावसाने तालुक्यातील मुद्‌गल बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तसेच माजलगाव धरण भरल्यामुळे उजवा कालव्यावरील पाण्यावर ही शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यामुळे तालुक्यात हरभरा व ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात ५४१ हेक्‍टरवर उसाची तर ६ हजार ३४७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.

अशी झाली पेरणी

ज्वारी ५७३५, गहू ५२८, मका १२१, हरभरा ६ हजार ३४७ , ऊस ५४१ असा एकूण १३ हजार २९० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून रब्बीसाठी सरासरी १२ हजार ६६९हेक्टर क्षेत्र आहे. जवळपास सरासरी क्षेत्राच्या १०४ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे