शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन ...

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण झाले असून यावर्षी ५४१ हेक्टरवर उसाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात झाली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रब्बी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी देखील पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने पिके देखील जोमात आली होती. मात्र सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या वातावरण बदलाचा फटका या पिकांना बसला. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव, धरणे

ओसंडून वाहू लागली. या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, अशी अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांनी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने देखील रब्बीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीक पद्धतीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २९० हेक्टरवर ऊस, हरभरा, ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.

हरभरा व उसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अतिवृष्टीचा पावसाने तालुक्यातील मुद्‌गल बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तसेच माजलगाव धरण भरल्यामुळे उजवा कालव्यावरील पाण्यावर ही शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यामुळे तालुक्यात हरभरा व ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात ५४१ हेक्‍टरवर उसाची तर ६ हजार ३४७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.

अशी झाली पेरणी

ज्वारी ५७३५, गहू ५२८, मका १२१, हरभरा ६ हजार ३४७ , ऊस ५४१ असा एकूण १३ हजार २९० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून रब्बीसाठी सरासरी १२ हजार ६६९हेक्टर क्षेत्र आहे. जवळपास सरासरी क्षेत्राच्या १०४ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे