शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन ...

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण झाले असून यावर्षी ५४१ हेक्टरवर उसाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात झाली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रब्बी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी देखील पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने पिके देखील जोमात आली होती. मात्र सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या वातावरण बदलाचा फटका या पिकांना बसला. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव, धरणे

ओसंडून वाहू लागली. या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, अशी अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांनी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने देखील रब्बीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीक पद्धतीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २९० हेक्टरवर ऊस, हरभरा, ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.

हरभरा व उसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अतिवृष्टीचा पावसाने तालुक्यातील मुद्‌गल बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तसेच माजलगाव धरण भरल्यामुळे उजवा कालव्यावरील पाण्यावर ही शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यामुळे तालुक्यात हरभरा व ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात ५४१ हेक्‍टरवर उसाची तर ६ हजार ३४७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.

अशी झाली पेरणी

ज्वारी ५७३५, गहू ५२८, मका १२१, हरभरा ६ हजार ३४७ , ऊस ५४१ असा एकूण १३ हजार २९० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून रब्बीसाठी सरासरी १२ हजार ६६९हेक्टर क्षेत्र आहे. जवळपास सरासरी क्षेत्राच्या १०४ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे