शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने शुगरबेल्ट धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. ...

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी सोडल्याने गोदाकाठचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे. २५ गावांतील शेतीवर याचा परिणाम पुढील काळात जाणवणार अशी चिन्ह दिसत आहेत.

गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात या वर्षी ४७ दलघमी पाण्याचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे मागील ८ महिन्यांपासून गोदावरीचे पात्र तुडुंब भरले होते. हा पाणीसाठा पाहून गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या दोन्ही बाजूंच्या २५ गावांच्या शिवारात या वर्षी नगदी पीक म्हणून ओळखले जात असलेल्या उसाचे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, उसाची शेती करणाऱ्यांची संख्या या वर्षी वाढलेली पाहावयास मिळत आहे. अजूनही काही गावांत ऊस लावला जात आहे. उसाचे क्षेत्र वाढत असल्याने, गोदाकाठ परिसर शुगरबेल्ट म्हणून उदयास येत आहे. आजूबाजूला ५ साखर कारखाने सुरू असल्याने उसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऊस वेळेवर कारखान्याला नेला जातो. मात्र, मागील ८ दिवसांपूर्वी डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा नांदेडला सोडून देण्यात आले आहे. २७ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जेमतेम २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातही गोदावरी नदीच्या पात्रात जास्त गाळ शिल्लक राहतो. त्यामुळे पुढील महिनाभरातच गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हजारो रुपये खर्च करून लागवड केलेले उसाचे पीक पाण्याअभावी वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे.