शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने शुगरबेल्ट धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. ...

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी सोडल्याने गोदाकाठचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे. २५ गावांतील शेतीवर याचा परिणाम पुढील काळात जाणवणार अशी चिन्ह दिसत आहेत.

गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात या वर्षी ४७ दलघमी पाण्याचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे मागील ८ महिन्यांपासून गोदावरीचे पात्र तुडुंब भरले होते. हा पाणीसाठा पाहून गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या दोन्ही बाजूंच्या २५ गावांच्या शिवारात या वर्षी नगदी पीक म्हणून ओळखले जात असलेल्या उसाचे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, उसाची शेती करणाऱ्यांची संख्या या वर्षी वाढलेली पाहावयास मिळत आहे. अजूनही काही गावांत ऊस लावला जात आहे. उसाचे क्षेत्र वाढत असल्याने, गोदाकाठ परिसर शुगरबेल्ट म्हणून उदयास येत आहे. आजूबाजूला ५ साखर कारखाने सुरू असल्याने उसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऊस वेळेवर कारखान्याला नेला जातो. मात्र, मागील ८ दिवसांपूर्वी डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा नांदेडला सोडून देण्यात आले आहे. २७ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जेमतेम २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातही गोदावरी नदीच्या पात्रात जास्त गाळ शिल्लक राहतो. त्यामुळे पुढील महिनाभरातच गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हजारो रुपये खर्च करून लागवड केलेले उसाचे पीक पाण्याअभावी वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे.