शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने शुगरबेल्ट धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. ...

पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी सोडल्याने गोदाकाठचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे. २५ गावांतील शेतीवर याचा परिणाम पुढील काळात जाणवणार अशी चिन्ह दिसत आहेत.

गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात या वर्षी ४७ दलघमी पाण्याचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे मागील ८ महिन्यांपासून गोदावरीचे पात्र तुडुंब भरले होते. हा पाणीसाठा पाहून गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या दोन्ही बाजूंच्या २५ गावांच्या शिवारात या वर्षी नगदी पीक म्हणून ओळखले जात असलेल्या उसाचे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, उसाची शेती करणाऱ्यांची संख्या या वर्षी वाढलेली पाहावयास मिळत आहे. अजूनही काही गावांत ऊस लावला जात आहे. उसाचे क्षेत्र वाढत असल्याने, गोदाकाठ परिसर शुगरबेल्ट म्हणून उदयास येत आहे. आजूबाजूला ५ साखर कारखाने सुरू असल्याने उसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऊस वेळेवर कारखान्याला नेला जातो. मात्र, मागील ८ दिवसांपूर्वी डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा नांदेडला सोडून देण्यात आले आहे. २७ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जेमतेम २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातही गोदावरी नदीच्या पात्रात जास्त गाळ शिल्लक राहतो. त्यामुळे पुढील महिनाभरातच गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हजारो रुपये खर्च करून लागवड केलेले उसाचे पीक पाण्याअभावी वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे.