शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

जिवंत शेतकऱ्यास मृत दाखवून बंद केले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार ...

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे हा शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. आता या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक साह्य व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत चार महिन्यांनी एक वेळा २ हजार रुपये असे वर्षातून तीन वेळा ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तालुक्यातील काष्टगाव येथील सीताराम ज्ञानोबा सुरवसे हे या योजनेसाठी पात्र होते. त्यांना आतापर्यंत ९ हप्त्यांचे अनुदानही मिळाले. मात्र, अचानक त्यांचे अनुदान बंद करण्यात आले. अनुदान का बंद झाले, याची चौकशी केली असता, शेतकरी मृत झाल्याने त्यांचे अनुदान बंद केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात प्रशासनाकडे कोणताही पुरावा नसताना परस्परच जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान बंद करण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, योजनेचे अनुदान मिळत नसताना, प्रत्यक्ष शेतकरी तहसील कार्यालयात खेटा मारत असताना, कोणतीही शहानिशा न करता, त्यालाच मृत दाखवून त्याला योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. दुसरीकडे अनेक अपात्र लाभार्थ्यांच्या नावे अनुदान दिले जात आहे, त्याची मात्र चौकशी होत नाही.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सीताराम ज्ञानोबा सुरवसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच काष्टगाव येथील शेतकऱ्यांप्रमाणेच इतर किती शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे, याचीही चौकशी करावी, काष्टगाव येथील सीताराम सुरवसे यांचे अनुदान परत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.