शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

जिवंत शेतकऱ्यास मृत दाखवून बंद केले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार ...

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे हा शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. आता या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक साह्य व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत चार महिन्यांनी एक वेळा २ हजार रुपये असे वर्षातून तीन वेळा ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तालुक्यातील काष्टगाव येथील सीताराम ज्ञानोबा सुरवसे हे या योजनेसाठी पात्र होते. त्यांना आतापर्यंत ९ हप्त्यांचे अनुदानही मिळाले. मात्र, अचानक त्यांचे अनुदान बंद करण्यात आले. अनुदान का बंद झाले, याची चौकशी केली असता, शेतकरी मृत झाल्याने त्यांचे अनुदान बंद केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात प्रशासनाकडे कोणताही पुरावा नसताना परस्परच जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान बंद करण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, योजनेचे अनुदान मिळत नसताना, प्रत्यक्ष शेतकरी तहसील कार्यालयात खेटा मारत असताना, कोणतीही शहानिशा न करता, त्यालाच मृत दाखवून त्याला योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. दुसरीकडे अनेक अपात्र लाभार्थ्यांच्या नावे अनुदान दिले जात आहे, त्याची मात्र चौकशी होत नाही.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सीताराम ज्ञानोबा सुरवसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच काष्टगाव येथील शेतकऱ्यांप्रमाणेच इतर किती शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे, याचीही चौकशी करावी, काष्टगाव येथील सीताराम सुरवसे यांचे अनुदान परत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.