शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

मनुष्यबळासाठी प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

परभणी : नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचाविण्यासाठी अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ...

परभणी : नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचाविण्यासाठी अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या आहेत.

‘परभणी जिल्ह्यातील २० लाख नागरिकांची सुरक्षा ९ कर्मचाऱ्यांवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तात अन्न व औषध प्रशासनातील कमी मनुष्यबळाचा प्रश्न मांडला होता. त्याचप्रमाणे, राज्यातील एकूण लोकसंख्या आणि अन्न व्यावसायिकांची संख्या यांच्या प्रमाणात अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याबाबत महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेने अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या वृत्ताची दखल घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली. त्यात अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विभागाला दिले.