शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

जिभेचे चोचले थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST

कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व ...

कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व मसालेदार खाद्यपदार्थ सेवनाचा मोह अनेकांना आवरत नाही. यातच अनेजण बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन नेहमीच करतात. यातून तब्येत खराब होऊ शकते, तसेच पोटाचे विकारही जडू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मूळव्याधीचा त्रासही होऊ शकतो. यामुळे बाहेरील खाद्य पदार्थ व तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

काय आहेत लक्षणे

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजन अचानक घटणे

शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे

त्वचा रोग होणे

चेहऱ्यावर फोड येणे

केस गळणे

काय काळजी घ्यावी

पावसाळ्यात असो का अन्य वातावरणात दररोजचे २ वेळचे जेवण वेळेवर करावे. यामध्ये कमी प्रमाणात तिखट पदार्थांचे सेवन करावे, तळलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, जेवनानंतर फळांचे सेवन करावे, तसेच हिरव्या पालेभाज्या, ताक, दूध, दही यांचे प्रमाण जेवनात वाढवावे.

असा आहे अल्सरचा धोका

तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. यातून पोट खराब होते. यानंतर अल्सरचे प्रमाण आमाशयात वाढते व पचनक्रियेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यातून वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढू शकतो.

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

दररोजच्या जेवणामध्ये सकस आहार, कमी तिखट पदार्थ व ताजे जेवण करणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया चांगली होते. पचनक्रिया चांगली राहिल्यास झोप चांगली येते. यामुळे पोट निरोगी राहते. दररोजच्या जेवणात वरण, भात, भाजी, भाकरी, काकडी, मुळा, गाजर यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. सकस आहारामुळे कफ, वात, पित्त हे तिन्ही दोष होत नाहीत, तसेच सकस आहारामुळे चरबीचे प्रमाणही वाढत नाही. - डॉक्टर प्रशांत धमगुंडे.