शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे चोचले थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST

कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व ...

कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व मसालेदार खाद्यपदार्थ सेवनाचा मोह अनेकांना आवरत नाही. यातच अनेजण बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन नेहमीच करतात. यातून तब्येत खराब होऊ शकते, तसेच पोटाचे विकारही जडू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मूळव्याधीचा त्रासही होऊ शकतो. यामुळे बाहेरील खाद्य पदार्थ व तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

काय आहेत लक्षणे

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजन अचानक घटणे

शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे

त्वचा रोग होणे

चेहऱ्यावर फोड येणे

केस गळणे

काय काळजी घ्यावी

पावसाळ्यात असो का अन्य वातावरणात दररोजचे २ वेळचे जेवण वेळेवर करावे. यामध्ये कमी प्रमाणात तिखट पदार्थांचे सेवन करावे, तळलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, जेवनानंतर फळांचे सेवन करावे, तसेच हिरव्या पालेभाज्या, ताक, दूध, दही यांचे प्रमाण जेवनात वाढवावे.

असा आहे अल्सरचा धोका

तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. यातून पोट खराब होते. यानंतर अल्सरचे प्रमाण आमाशयात वाढते व पचनक्रियेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यातून वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढू शकतो.

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

दररोजच्या जेवणामध्ये सकस आहार, कमी तिखट पदार्थ व ताजे जेवण करणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया चांगली होते. पचनक्रिया चांगली राहिल्यास झोप चांगली येते. यामुळे पोट निरोगी राहते. दररोजच्या जेवणात वरण, भात, भाजी, भाकरी, काकडी, मुळा, गाजर यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. सकस आहारामुळे कफ, वात, पित्त हे तिन्ही दोष होत नाहीत, तसेच सकस आहारामुळे चरबीचे प्रमाणही वाढत नाही. - डॉक्टर प्रशांत धमगुंडे.