शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लसींचा साठा संपला; केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपला असून, शनिवारी लसींअभावी सर्व केंद्रे बंद ठेवावी लागली. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत ...

परभणी : जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपला असून, शनिवारी लसींअभावी सर्व केंद्रे बंद ठेवावी लागली. नागरिक लसीकरणासाठी पुढे येत असून, शनिवारी सकाळी केंद्रासमोर नागरिकांची मोठी रांग लागली होती. अखेर लस नसल्याचे जाहीर केल्यानंतर या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आता नागरिक स्वतः लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु, जिल्ह्यात मागच्या अनेक दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लस मिळविण्यासाठी शहरातील प्रत्येक केंद्रावर नागरिक चकरा मारत आहेत. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु, या नागरिकांसाठी जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. शासनाने १ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील नागरिकांना लस द्यायची कशी, असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्यातरी लसींचा खडखडाट आहे. शनिवारी लस संपल्याने अनेक केंद्रांवर लस नसल्याचे फलक लावण्यात आले. विशेष म्हणजे, सकाळपासूनच नागरिकांनी या केंद्रांवर रांग लावली होती. परंतु, उशिराने केंद्रावरील अधिकाऱ्यांनी लस नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना परतावे लागले.

१२ लाख डोसेसची गरज

जिल्ह्यात सद्यस्थितीला लसींचा साठा संपला आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १८ वर्षांपुढील सुमारे १२ लाख नागरिक आहेत. त्यामुळे या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी किमान १२ लाख डोसेस जिल्ह्याला लागणार आहेत. प्रत्यक्षात ५ ते ६ हजार डोसेस एवढाच लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसींअभावी गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांनाच लाभ

राज्यस्तरावरून लसींचा वेळेत आणि मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार नागरिकांनाच लसीकरण झाले आहे. ८९ हजार ७५५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ ७ हजार ४० एवढीच आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करावा लागणार आहे.

खासगी दवाखान्यांना स्वतः खरेदी करावी लागणार लस

जिल्ह्यातील ४ खासगी दवाखान्यांमध्ये सध्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाकडून या दवाखान्यांना ठरावीक किमतीमध्ये लस उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, राज्यस्तरावरील बदललेल्या धोरणांमुळे आता खासगी दवाखान्यांना स्वतःहून कंपनीमार्फत लस खरेदी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून लस मिळणार नसल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

रविवारीही बंद राहणार केंद्र

कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने शनिवारी दिवसभरात एकाही केंद्रावर लसीकरण झाले नाही. रविवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर लसीकरण बंद राहणार आहे. सोमवारपासून मात्र या लसीकरणाला प्रारंभ होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.