शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. ...

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. यातून प्रवाशांची ने-आण करण्यात येते. मात्र मागील काही दिवसापासून नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती अद्यापही दूर झालेली नाही. त्यामुळे एसटी बसेसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले. परभणी आगारामधून कोविडपूर्वी ९ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबत होत्या. मात्र, सद्यस्थितीत केवळ ८ बसेस मुक्कामी थांबतात. जिंतूर आगारातील १७ बसेस कोविडपूर्वी मुक्कामी थांबत असत. परंतू, आता या केवळ ६ बसेस मुक्कामी सोडण्यात येत आहेत. गंगाखेडमध्ये केवळ १६ बसेस तर पाथरी आगारातून केवळ १२ बसेस मुक्कामी पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे चार आगारातून पूर्वी ७० बसेस या ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची गैरसोय दूर करत होत्या. मात्र सद्यस्थितीत ४२ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची ने-आण करत आहेत. ही संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत असून नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा प्रवाशांना घ्यावा लागत आहे.

शहरी भागात जाणाऱ्या गाड्या पुल्ल

परभणी तसेच अन्य आगारातून तालुक्याच्या ठिकाणी व राज्यातील विविध जिल्ह्यात शहरी भागात जाणाऱ्या बसेस सध्या फुल्ल होऊन धावत आहेत. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी बसेसला प्रतिसाद असतानाही त्या बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना जागा मिळेना

परभणी तालुक्यातील धर्मापूरी, टाकळी, आर्वी, पिंगळी, जिंतूर तालुक्यातील बोरी, कौसडी, वालूर यासह पूर्णा तालुक्यातील ताडकळस व अन्य तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण बसेसच्या दररोजच्या अनेक फेऱ्या होतात. यात सकाळी तसेच सायंकाळी या बसेसला प्रवाशांना जागा मिळत नाही.

मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास

जिंतूर आगारातून सध्या केवळ काही गावांनाच मुक्कामी बसेस सोडण्यात येतात. यामुळे अनेक गावांना जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. - अर्थव काळे, कौसडी.

ताडकळस तसेच फुलकळस या परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या बसेस मुक्कामी सुरु करण्यात याव्यात. या भागातून परभणी येथे दररोज शेकडो शेतकरी तसेच विद्यार्थी विविध कामासाठी जात असतात. यामुळे रात्री गावाकडे परतताना लवकर सुटणारी बस पकडून जावे लागत आहे. - उत्तम घाडगे, उखळद.