शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, जवस, करडई आदी पिकांची पेरणी केली. ही पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मूग, सोयाबीन व उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली. बहरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले हे पीक जमीनदोस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीचे दु:ख पचवत रबी हंगामात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई, जवस, ऊस आदी पिकांची लागवड केली. सध्या या पिकांना शेतकऱ्यांकडून ३ ते ४ पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्प व जायकवाडी धरणाच्या पाण्यावर ही पिके सध्या बहरली आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या रबी हंगामात पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बहरलेल्या ज्वारी पिकातून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या बळीराजाला खरीपापाठोपाठ रबी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

...अशी झाली पेरणी

२०२०-२१ या रबी हंगामात ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी, ३९ हजार १४ हेक्टरवर गहू, १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभरा, १ हजार १९७ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी हजारो रुपयांचा खर्चही या पिकांवर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रबी हंगामात सर्वाधिक १८६ टक्के हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी काढून ठेवलेले हरभरा पीक व काढणीस आलेल्या गव्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.