शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, जवस, करडई आदी पिकांची पेरणी केली. ही पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मूग, सोयाबीन व उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली. बहरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले हे पीक जमीनदोस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीचे दु:ख पचवत रबी हंगामात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई, जवस, ऊस आदी पिकांची लागवड केली. सध्या या पिकांना शेतकऱ्यांकडून ३ ते ४ पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्प व जायकवाडी धरणाच्या पाण्यावर ही पिके सध्या बहरली आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या रबी हंगामात पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बहरलेल्या ज्वारी पिकातून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या बळीराजाला खरीपापाठोपाठ रबी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

...अशी झाली पेरणी

२०२०-२१ या रबी हंगामात ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी, ३९ हजार १४ हेक्टरवर गहू, १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभरा, १ हजार १९७ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी हजारो रुपयांचा खर्चही या पिकांवर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रबी हंगामात सर्वाधिक १८६ टक्के हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी काढून ठेवलेले हरभरा पीक व काढणीस आलेल्या गव्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.