शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, जवस, करडई आदी पिकांची पेरणी केली. ही पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मूग, सोयाबीन व उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली. बहरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले हे पीक जमीनदोस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीचे दु:ख पचवत रबी हंगामात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई, जवस, ऊस आदी पिकांची लागवड केली. सध्या या पिकांना शेतकऱ्यांकडून ३ ते ४ पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्प व जायकवाडी धरणाच्या पाण्यावर ही पिके सध्या बहरली आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या रबी हंगामात पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बहरलेल्या ज्वारी पिकातून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या बळीराजाला खरीपापाठोपाठ रबी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

...अशी झाली पेरणी

२०२०-२१ या रबी हंगामात ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी, ३९ हजार १४ हेक्टरवर गहू, १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभरा, १ हजार १९७ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी हजारो रुपयांचा खर्चही या पिकांवर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रबी हंगामात सर्वाधिक १८६ टक्के हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी काढून ठेवलेले हरभरा पीक व काढणीस आलेल्या गव्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.