शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, जवस, करडई आदी पिकांची पेरणी केली. ही पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मूग, सोयाबीन व उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली. बहरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले हे पीक जमीनदोस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीचे दु:ख पचवत रबी हंगामात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई, जवस, ऊस आदी पिकांची लागवड केली. सध्या या पिकांना शेतकऱ्यांकडून ३ ते ४ पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्प व जायकवाडी धरणाच्या पाण्यावर ही पिके सध्या बहरली आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या रबी हंगामात पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बहरलेल्या ज्वारी पिकातून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या बळीराजाला खरीपापाठोपाठ रबी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

...अशी झाली पेरणी

२०२०-२१ या रबी हंगामात ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी, ३९ हजार १४ हेक्टरवर गहू, १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभरा, १ हजार १९७ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी हजारो रुपयांचा खर्चही या पिकांवर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रबी हंगामात सर्वाधिक १८६ टक्के हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी काढून ठेवलेले हरभरा पीक व काढणीस आलेल्या गव्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.