शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

कोरोना परतू लागताच पुण्या, मुंबईकडे ओढा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसा जिल्ह्यातील कामगार आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे पुण्या- मुंबईकडे जाणाऱ्या ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसा जिल्ह्यातील कामगार आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे पुण्या- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना चांगलीच गर्दी होत आहे.कोरोनाच्या संसर्ग काळात अडकून पडू नये, या धास्तीने पुणे, मुंबई, औरंगाबाद या मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले अनेक कामगार जिल्ह्यात परतले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हे चित्र दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही हे कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते; मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे कामगार पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी जात आहेत. मागील महिनाभरापासून येथील बसस्थानकावर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होत असून, रेल्वे गाड्यांचीही हीच स्थिती आहे.

२ हजार कामगार आले होते जिल्ह्यात

परजिल्ह्यातून कामाच्या शोधार्थ गेेलेले २ हजार कामगार दुसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात दाखल झाले होते, अशी नोंद येथील आरोग्य विभागाने घेतली आहे. या कामगारांपैकी बहुतांश कामगार परतीच्या वाटेवर आहेत.

परदेशात जाण्याचीही तयारी...

शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थलांतरित झालेले जिल्ह्यातील युवक आता पुन्हा परदेशात जाण्याची तयारी करीत आहेत. या युवकांसाठी मनपाने स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, युवकांची संख्या ८ ते १० असल्याची माहिती मिळाली.