शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरोना संपताच तेराशे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. ...

जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने १ हजार ३३४ नवीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात रूजू करून घेतले. मात्र, आता जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असताना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ टक्के बेड रिक्त आहेत. सध्या केवळ १४ सेंटरमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर गंडांतर येणार आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून कोरोना काळात जीव धोक्यात घालत रुग्णांवर उपचार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता पुन्हा एकदा नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे गरज सरो वैद्य मरो असल्याची प्रचिती येत आहे.

दोनशे कर्मचाऱ्यांचे मानधनही थकले

आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा हजार, तर जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येत आहे. मार्च, एप्रिल, मे व जून चार महिने काम करणाऱ्या १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांपैकी जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचे किरकोळ कागदपत्रांमुळे मानधन थकले आहे. त्यामुळे एकीकडे जीव धोक्यात घालून काम करावे लागत असताना दुसरीकडे नोकरी टिकण्याची शाश्वती नसताना मानधनही थकले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत.