शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोरोना संपताच तेराशे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. ...

जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने १ हजार ३३४ नवीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात रूजू करून घेतले. मात्र, आता जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असताना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ टक्के बेड रिक्त आहेत. सध्या केवळ १४ सेंटरमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर गंडांतर येणार आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून कोरोना काळात जीव धोक्यात घालत रुग्णांवर उपचार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता पुन्हा एकदा नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे गरज सरो वैद्य मरो असल्याची प्रचिती येत आहे.

दोनशे कर्मचाऱ्यांचे मानधनही थकले

आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा हजार, तर जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येत आहे. मार्च, एप्रिल, मे व जून चार महिने काम करणाऱ्या १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांपैकी जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचे किरकोळ कागदपत्रांमुळे मानधन थकले आहे. त्यामुळे एकीकडे जीव धोक्यात घालून काम करावे लागत असताना दुसरीकडे नोकरी टिकण्याची शाश्वती नसताना मानधनही थकले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत.