शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जलशुद्धीकरण केंद्रावर होणार सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

परभणी शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा केंद्रांवर दरमहा येणारे ...

परभणी शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा केंद्रांवर दरमहा येणारे विजेचे बिल कमी करण्यासाठी व त्यात बचत व्हावी या उद्देशाने महाऊर्जा विभागाच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. परभणी शहराला येलदरी, धर्मापुरी, रहाटी व कारेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. या चारही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत.

धर्मापुरीचे काम अंतिम टप्प्यात

अमृत योजनेंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्र येथे इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू आहे. २.१ मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेद्वारे केली जाणार आहे. धर्मापुरी येथील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रहाटी, कारेगाव आणि येलदरी येथे हे काम हाती घेण्यात येणार आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.

साडेनऊ कोटींचा खर्च

महाऊर्जा विभाग प्रकल्प पूर्ण करणार असली तरी त्यास लागणारी जागा आणि निधी महापालिकेने दिला आहे. यासाठी जवळपास साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अमृत योजनेंतर्गत व महापालिकेच्या निधीतून हे काम पूर्ण होणार आहे. दर महिन्याला साठ लाख रुपयांचे वीज बिल महापालिकेला पाणीपुरवठा वितरणासाठी लागणाऱ्या वीज वापरातून येते. सौर ऊर्जेचा वापर केल्यास ५० टक्के युनिट्सचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे वीज बचत होण्यास मदत होणार आहे.