शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

सहा दिवसात नऊ गावांना कोरोनाने वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST

परभणी : ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ९ गावांमध्ये केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण ...

परभणी : ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ९ गावांमध्ये केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या साडेपाच हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना ग्रामस्थांनी मात्र आपले गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु हा संसर्ग इतका झपाट्याने वाढत आहे की, गावेच्या गावे कोरोनाबाधित होत आहेत.

जिल्ह्यात एकूण ८४८ गावे असून, २७ एप्रिल रोजी त्यातील ६३९ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली होती. एप्रिल महिन्यापर्यंत २०९ गावांनी स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यात यश मिळविले. केवळ ६ दिवसांत ३ मे रोजी ६४८ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या २०९ गावांमधील ९ गावात केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण नोंद झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी २०० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर ठेवले असून, यापुढे तरी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी या २०० गावांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

९० गावात दहापेक्षा अधिक रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ६४८ गावांपैकी ९० गावांमध्ये १० व त्यापेक्षा अधिक बाधित रुग्णांची संख्या आहे. परभणी तालुक्‍यातील सर्वाधिक २३ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण आहेत, तर पूर्णा आणि जिंतूर या तालुक्यात प्रत्येकी १५ गावांमध्ये कोरोना संसर्ग वाढला आहे. सेलू तालुक्यातील १० गावांत बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

सहा दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू

२७ एप्रिल रोजी ग्रामीण भागात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १२६ होती. ३ मे रोजी ही संख्या १३८ झाली. सहा दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ मेपर्यंत परभणी तालुक्यात सर्वाधिक २७ रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले, तर गंगाखेड तालुक्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २२ एवढी आहे. पाथरी तालुक्यात १६, पूर्णा १५, जिंतूर १८, मानवत १२, पालम ११, सेलू १५ आणि सोनपेठ तालुक्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

५ हजार ७०० रुग्णांवर उपचार

ग्रामीण भागात सध्या ५ हजार ७०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. या रुग्णांवर परभणी शहरातील रुग्णालय तसेच गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक १ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहेत. पाथरी ३१२, पूर्णा ७५८, जिंतूर ९२२, गंगाखेड ४३६, मानवत ३४७, पालम २७३, सेलू ६१९ आणि सोनपेठ तालुक्यात २९९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय बाधित गावे

परभणी ११४

पाथरी ४७

पूर्णा ७५

जिंतूर ११४

गंगाखेड ८२

मानवत ४३

पालम ५९

सेलू ७७

सोनपेठ ३७