शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

रेशीम कोषाला मिळाला प्रती किलो ३६० रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

पाथरी : कोविड-१९ मुळे इतर क्षेत्राबरोबरच रेशीम शेतीलाही मोठा फटका बसला होता. रेशीम कोषाचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत ...

पाथरी : कोविड-१९ मुळे इतर क्षेत्राबरोबरच रेशीम शेतीलाही मोठा फटका बसला होता. रेशीम कोषाचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. मागील आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच रेशीम कोषाचा भाव वाढला असून, १८० रुपये किलोवरून थेट ३६० रुपये प्रतीकिलो भाव झाला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील रेशीम उत्पादनाचे सर्वाधिक क्षेत्र मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातील रेशीम कोष दर्जेदार असल्याने त्यास भावही अधिक मिळतो. मागील काही वर्षात मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कलही या शेतीकडे वळला आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील रामनगर येथे रेशीम कोष विक्रीसाठीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. राज्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी या बाजारपेठेची निवड करतो. मात्र कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीसाठी बाजारपेठेपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी रेशीम कोषाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. कधीकाळी ५०० रुपये किलोपेक्षा जास्त दराने विक्री होणाऱ्या कोषाला १०० ते १५० रुपये प्रती किलोचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा येथे एकमेव रेशीम खरेदी मार्केट असल्याने शेतकऱ्यांना इतर ठिकाणी विक्री करण्याची सोय नसल्याने अधिक भाव मिळाला नाही. आता रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाल्याने कर्नाटक राज्यातील बाजारपेठेत रेशीम कोष विक्रीस नेता येत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत रेशीम कोषाचे दर वाढले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रेशीम कोषाचे दर १८० वरून ३६० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे ८ ते ९ महिन्यानंतर रेशीम कोषाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात ८८८ हेक्टरवर रेशीम शेती

परभणी जिल्ह्यात मनरेगा आणि इतर योजनेत साधारणपणे ८८८ हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. मागील वर्षी रेशीम कोषासाठी जिल्ह्यात साधारणपणे ३ लाख १४ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांकडून मागणी केली होती. त्यातून शेतकऱ्यांना १६७ टन कोष उत्पादन झाले होते. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते नोव्हेंबरअखेर १ लाख २१ हजार ४५९ अंडीपुंज मागविण्यात आले होते. त्यातून ६७ टन रेशीम कोष निर्मिती झाली आहे. बाजारपेठेत आता दर वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत.

मेहनती शेतकऱ्यांचे पीक म्हणजे रेशीम शेती आहे. भावात चढउतार होत असल्याने त्याचा फटका बसला असला तरी आता भाव वाढल्याने तोटा भरून निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये.

-वैभव खुडे, रेशीम उत्पादक शेतकरी, सिमूरगव्हाण

लाॅकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम बाजारपेठेत कोष उत्पादक शेतकऱ्यांना कोषाची विक्री करण्यासाठी सोय झाली. भाव कमी मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे कोषाचे नुकसान झाले नाही.

-जी.आर. कदम, रेशीम विकास अधिकारी, परभणी