शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम कोषाला मिळाला प्रती किलो ३६० रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

पाथरी : कोविड-१९ मुळे इतर क्षेत्राबरोबरच रेशीम शेतीलाही मोठा फटका बसला होता. रेशीम कोषाचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत ...

पाथरी : कोविड-१९ मुळे इतर क्षेत्राबरोबरच रेशीम शेतीलाही मोठा फटका बसला होता. रेशीम कोषाचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. मागील आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच रेशीम कोषाचा भाव वाढला असून, १८० रुपये किलोवरून थेट ३६० रुपये प्रतीकिलो भाव झाला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील रेशीम उत्पादनाचे सर्वाधिक क्षेत्र मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातील रेशीम कोष दर्जेदार असल्याने त्यास भावही अधिक मिळतो. मागील काही वर्षात मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कलही या शेतीकडे वळला आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील रामनगर येथे रेशीम कोष विक्रीसाठीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. राज्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी या बाजारपेठेची निवड करतो. मात्र कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीसाठी बाजारपेठेपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी रेशीम कोषाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. कधीकाळी ५०० रुपये किलोपेक्षा जास्त दराने विक्री होणाऱ्या कोषाला १०० ते १५० रुपये प्रती किलोचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा येथे एकमेव रेशीम खरेदी मार्केट असल्याने शेतकऱ्यांना इतर ठिकाणी विक्री करण्याची सोय नसल्याने अधिक भाव मिळाला नाही. आता रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाल्याने कर्नाटक राज्यातील बाजारपेठेत रेशीम कोष विक्रीस नेता येत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत रेशीम कोषाचे दर वाढले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रेशीम कोषाचे दर १८० वरून ३६० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे ८ ते ९ महिन्यानंतर रेशीम कोषाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात ८८८ हेक्टरवर रेशीम शेती

परभणी जिल्ह्यात मनरेगा आणि इतर योजनेत साधारणपणे ८८८ हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. मागील वर्षी रेशीम कोषासाठी जिल्ह्यात साधारणपणे ३ लाख १४ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांकडून मागणी केली होती. त्यातून शेतकऱ्यांना १६७ टन कोष उत्पादन झाले होते. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते नोव्हेंबरअखेर १ लाख २१ हजार ४५९ अंडीपुंज मागविण्यात आले होते. त्यातून ६७ टन रेशीम कोष निर्मिती झाली आहे. बाजारपेठेत आता दर वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत.

मेहनती शेतकऱ्यांचे पीक म्हणजे रेशीम शेती आहे. भावात चढउतार होत असल्याने त्याचा फटका बसला असला तरी आता भाव वाढल्याने तोटा भरून निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये.

-वैभव खुडे, रेशीम उत्पादक शेतकरी, सिमूरगव्हाण

लाॅकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम बाजारपेठेत कोष उत्पादक शेतकऱ्यांना कोषाची विक्री करण्यासाठी सोय झाली. भाव कमी मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे कोषाचे नुकसान झाले नाही.

-जी.आर. कदम, रेशीम विकास अधिकारी, परभणी