शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परभणीत शिवसेनेचा मेळावा; युतीचा धर्म पाळावाच लागेल-बंडू जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:22 IST

आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था असली तरी युतीचा धर्म पाळून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले जाईल, असे प्रतिपादन खा.बंडू जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था असली तरी युतीचा धर्म पाळून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले जाईल, असे प्रतिपादन खा.बंडू जाधव यांनी केले.पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी ग्रामीण भागातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे शुक्रवारी परभणीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.जाधव बोलत होते. व्यासपीठावर समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाटगे पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा.पंढरीनाथ धोंडगे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, मंगलाताई कथले, तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुुले, रंगनाथ वाकणकर, जि.प. सदस्य जनार्दन सोनवणे, देविदास कच्छवे, माणिक आव्हाड, युवा सेनेचे दीपक बारहाते, प्रल्हाद लाड, माजी जि.प.अध्यक्ष उत्तमराव कच्छवे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा.बंडू जाधव म्हणाले की, निवडणुका या पक्षासाठी जिंकायच्या असतात. व्यक्ती या गौण आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नेते माझ्या विरोधात होते; परंतु, जनता आणि सच्चे शिवसैनिक आपल्या सोबत होते. त्यामुळेच अनेकांचे अंदाज चुकवित विजय मिळविला. परभणी जिल्ह्यातील जनता शिवसेनेवर भरभरुन प्रेम करते. उमेदवार कोण आहे, हे पाहण्याऐवजी फक्त धनुष्यबाण पाहून मतदान करते. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार आहे. त्यामुळे युतीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याचे प्रत्येकाने मनापासून काम करावे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विजय होतील, याच दृष्टीकोनातून प्रत्येकाने कामाला लागावे. परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे; परंतु, बाकी तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था आहे. त्यामुळे कोणता मतदारसंघ शिवसेनेकडे राहील व कोणता मतदारसंघ भाजपाकडे जाईल, हे आताच सांगता येणार नाही. वरिष्ठ पातळीवरुन यासंदर्भात निर्णय होईल. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी युतीचा धर्म पाळून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. इच्छुक उमेदवारांनी उद्यापासूनच प्रत्येक गावात जावून ग्रामस्थांशी संवाद साधावा. शिवसैनिकांशी बोलावे. शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती जनतेला द्यावी, असेही ते म्हणाले. पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. दोन वेळा येथून पक्षाने विजय मिळविला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना सतीश घाटगे म्हणाले की, परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे काम आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणालाही मिळो, निष्ठेने शिवसेनेचे काम करेल. खा.बंडू जाधव जो निर्णय देतील, तो आपणास मान्य राहील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश इक्कर यांनी केले.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv Senaशिवसेना