शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

७० टक्क्यांनी घटले कोरोनाचे गंभीर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची ...

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणा रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासाठी झटत होती. दोन महिन्यांच्या धकाधकीच्या काळात गंभीर प्रकृती झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला जम्बो सिलिंडरच्या सहाय्याने ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. त्यानंतरही ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने परभणी येथे दोन ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात आले. १ हजार लिटरच्या क्रायोजनिक टँकच्या सहाय्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी जिल्ह्यातील पीक मंथ ठरले आहेत. या काळात रुग्णांची संख्या दररोज १५० ते २०० पर्यंत पोहचली होती. त्यात गंभीर रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या दरम्यान होती. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असे. ही परिस्थिती आता बदलली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, जे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे (माॅर्टेलिटी) कमी असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीला दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ ४ ते ५ रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे २० केएल आणि १० केएल ऑक्सिजन टँकचाच वापर सध्या होत आहे. साधारणत: ७० टक्क्यांनी ऑक्सिजनचा वापर घटला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.

जिल्ह्यात दररोज ४

गंभीर रुग्ण दाखल

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी ३५ ते ४० गंभीर रुग्ण दाखल होत होते. हे प्रमाण आता ४ ते ५ रुग्णांवर आले आहे. त्यातही अनेक रुग्णांना फारसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत नाही. कोरेाना व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात अपघात, असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना काही प्रमाणात ऑक्सिजन वापरले जाते.

दररोज २० केएल ऑक्सिजन वापर

जिल्ह्यात आता ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्याऐवजी २० व १० केएल सिलिंडर टँक वापरले जात आहेत. ४ ते ५ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. त्यामुळे १० ते २० केएलच्या टँकचाच वापर होत आहे. त्यातही कोरोना नसलेल्या रुग्णांनाही याच माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाणही ४ ते ५ रुग्णांवर येऊन ठेपले आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी असल्याचे जाणवते.

- किशोर सुरवसे

निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी