शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

७० टक्क्यांनी घटले कोरोनाचे गंभीर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची ...

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणा रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासाठी झटत होती. दोन महिन्यांच्या धकाधकीच्या काळात गंभीर प्रकृती झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला जम्बो सिलिंडरच्या सहाय्याने ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. त्यानंतरही ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने परभणी येथे दोन ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात आले. १ हजार लिटरच्या क्रायोजनिक टँकच्या सहाय्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी जिल्ह्यातील पीक मंथ ठरले आहेत. या काळात रुग्णांची संख्या दररोज १५० ते २०० पर्यंत पोहचली होती. त्यात गंभीर रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या दरम्यान होती. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असे. ही परिस्थिती आता बदलली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, जे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे (माॅर्टेलिटी) कमी असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीला दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ ४ ते ५ रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे २० केएल आणि १० केएल ऑक्सिजन टँकचाच वापर सध्या होत आहे. साधारणत: ७० टक्क्यांनी ऑक्सिजनचा वापर घटला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.

जिल्ह्यात दररोज ४

गंभीर रुग्ण दाखल

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी ३५ ते ४० गंभीर रुग्ण दाखल होत होते. हे प्रमाण आता ४ ते ५ रुग्णांवर आले आहे. त्यातही अनेक रुग्णांना फारसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत नाही. कोरेाना व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात अपघात, असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना काही प्रमाणात ऑक्सिजन वापरले जाते.

दररोज २० केएल ऑक्सिजन वापर

जिल्ह्यात आता ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्याऐवजी २० व १० केएल सिलिंडर टँक वापरले जात आहेत. ४ ते ५ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. त्यामुळे १० ते २० केएलच्या टँकचाच वापर होत आहे. त्यातही कोरोना नसलेल्या रुग्णांनाही याच माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाणही ४ ते ५ रुग्णांवर येऊन ठेपले आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी असल्याचे जाणवते.

- किशोर सुरवसे

निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी