शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

७० टक्क्यांनी घटले कोरोनाचे गंभीर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची ...

एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणा रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासाठी झटत होती. दोन महिन्यांच्या धकाधकीच्या काळात गंभीर प्रकृती झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला जम्बो सिलिंडरच्या सहाय्याने ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. त्यानंतरही ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने परभणी येथे दोन ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात आले. १ हजार लिटरच्या क्रायोजनिक टँकच्या सहाय्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी जिल्ह्यातील पीक मंथ ठरले आहेत. या काळात रुग्णांची संख्या दररोज १५० ते २०० पर्यंत पोहचली होती. त्यात गंभीर रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या दरम्यान होती. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असे. ही परिस्थिती आता बदलली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, जे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे (माॅर्टेलिटी) कमी असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीला दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ ४ ते ५ रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे २० केएल आणि १० केएल ऑक्सिजन टँकचाच वापर सध्या होत आहे. साधारणत: ७० टक्क्यांनी ऑक्सिजनचा वापर घटला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.

जिल्ह्यात दररोज ४

गंभीर रुग्ण दाखल

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी ३५ ते ४० गंभीर रुग्ण दाखल होत होते. हे प्रमाण आता ४ ते ५ रुग्णांवर आले आहे. त्यातही अनेक रुग्णांना फारसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत नाही. कोरेाना व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात अपघात, असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना काही प्रमाणात ऑक्सिजन वापरले जाते.

दररोज २० केएल ऑक्सिजन वापर

जिल्ह्यात आता ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्याऐवजी २० व १० केएल सिलिंडर टँक वापरले जात आहेत. ४ ते ५ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. त्यामुळे १० ते २० केएलच्या टँकचाच वापर होत आहे. त्यातही कोरोना नसलेल्या रुग्णांनाही याच माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाणही ४ ते ५ रुग्णांवर येऊन ठेपले आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी असल्याचे जाणवते.

- किशोर सुरवसे

निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी