शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चार शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळांची निवड करण्यात ...

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूचेता पाटेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा अभियान परिषदेद्वारे या अभियानासाठी पालम तालुक्यातील सायाळा, पुयनी व नाव्हा येथील तर गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक कायापालट, शाळा समितीचे बळकटीकरण व शाळामध्ये आनंददायी शिक्षण होण्यासाठी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी ‘एक मूल एक झाड’ ही संकल्पना राबवावी व या कार्यक्रमाला सांगड म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलचे वाटप करण्याचे निर्देश यावेळी मुगळीकर यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित शाळांना संरक्षण भिंती, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी परसबाग निर्माण करणे, शौचालयाची दुरुस्ती व शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आरओ, कंपोस्ट पिट याबाबत निर्देश दिले. शिक्षणाधिकारी पाटेकर यांनी तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिनी आदर्श शाळा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पालमचे गटशिक्षणाधिकारी ढवळे, गंगाखेडचे विस्तार अधिकारी भालेराव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, तालुका समन्वयक अमरदीप वाकळे, शिवराज शिंदे, हनुमंत हिंगारूपे आदी उपस्थित होते.