शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अर्धवट; वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST

डेन्स पार्क संकल्पना पर्यावरणास पूरक परभणी : येथील वन विभागाच्या वतीने वृक्षलागवडीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आतापर्यंत कोट्यवधी वृक्षे ...

डेन्स पार्क संकल्पना पर्यावरणास पूरक

परभणी : येथील वन विभागाच्या वतीने वृक्षलागवडीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आतापर्यंत कोट्यवधी वृक्षे लावण्यात आली. मात्र, पाण्याअभावी ती जागेवरच जळून गेली. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने डेन्स पार्क ही संकल्पना अमलात आणली. सद्य:स्थितीत ही संकल्पना पर्यावरणास पूरक ठरताना दिसून येत आहे.

शिस्त लावण्याऐवजी दंडावरच भर

परभणी : येथील शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी नियम मोडला म्हणून दंडच आकारण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे सिग्नल यंत्रणा धूळ खात पडून असताना दुसरीकडे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

हादगाव ते वाकडी रस्त्याची दुरवस्था

सेलू : तालुक्यातील हादगाव पावडे ते ब्रह्मवाकडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे.

ग्रामीण भागात आठवडी बाजार फुल

परभणी : दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला खो दिला जात आहे.

मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली आहे. सध्या हे पीक काढणीस आले आहे. मात्र, ग्रामीण भागात या पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. मजुरी वाढूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

डिग्रस ते मांडवा रस्त्याची दुरवस्था

परभणी : तालुक्यातील डिग्रस पाटी ते मांडवा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत असताना बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.