शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मावेजाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

परभणी : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न १५ दिवसांत सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ...

परभणी : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न १५ दिवसांत सोडवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता अंशुमन श्रीवास्तव यांना दिल्या आहेत.

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून वळणरस्ता काढण्यात आला आहे. ही प्रक्रिया ३ ते ४ वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने शहराअंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचा व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक वेळी या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व अडचणी पार करून गतवर्षी वळण रस्त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. शेतकऱ्यांची जमीननिहाय यादी तयार करून त्यांच्याकडून हरकतीही घेण्यात आल्या. या शेतकऱ्यांच्या मावेजापोटीची रक्कमही जाहीर करण्यात आली. मात्र, ही रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली नाही. मावेजाची प्रक्रिया करीत असताना त्यासाठी भूमीराशी पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करावयाची आहे. परंतु, त्यास विलंब लागत असल्याने जमीन संपादनाचा आणि मावेजाचा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून रखडला आहे.

गुरुवारी या प्रश्नावर माजी महापौर प्रताप देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना रखडलेल्या प्रश्नाची माहिती दिली. बाह्यवळण रस्त्याच्या मावेजासाठी अक्षम्य दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते मंत्रालयातील अधीक्षक अभियंता अंशुमन श्रीवास्तव यांना फोन करून येत्या १५ दिवसांत भूमीराशी पोर्टलची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा अदा करावा, अशा सूचना केल्या. यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत हा निधी वर्ग केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. याप्रसंगी कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांचीही उपस्थिती होती.

६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

परभणी शहराच्या बाहेरून १४.५ किमी अंतराचा बाह्यवळण रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी पारवा, धर्मापुरी, परभणी, वांगी आणि असोला या पाच गावांची २१९.७५ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. जमीन संपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून, मावेजा अदा करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.

बाह्यवळण रस्त्याच्या प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु, प्रशासकीय उदासीनता असल्याने निधी प्राप्त होवूनही जमीन संपादन रखडले आहे. याप्रश्नी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना सूचना केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

प्रवीण देशमुख, परभणी