शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचा अहवाल सादर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र ...

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे अभियंत्यांकडून होत नसल्याने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १९ ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले. या ग्रामस्थांनी घरांचे पंचनामे करुन मदत द्यावी, यासाठी तहसील कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी निवेदने, अर्ज व तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करुन अहवाल सादर कऱण्याच्या सूचना पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला २६ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.त्यानंतर एक महिना अहवालाची वाट पाहून २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा या अभियंत्याला लेखी पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले; परंतु, या पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्याने तहसीलदारांचे दोन्ही आदेश मिळाल्यापासून दीड महिना उलटला तरीही १९ पैकी एकाही नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला नाही. तहसीलदारांना अहवालही सादर केला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच अधिकाऱ्यांनाही कामचुकार कर्मचाऱ्यांचा फटका बसत असल्याचे या प्रकरणावरुन समोर येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरुद्ध जिंतूर तहसीलदारांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिंतूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

या गावातील घरांचे नुकसान

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिंतूर तालुक्यातील ४, बोरी १. घागरा २, चारठाणा १, सोरजा १, मोहाडी १, वर्णा ८ तर रेपा येथील शेख कासम बाबामियाँ या ग्रामस्थाचे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले होते. या घटनांमध्ये घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान होऊनही घरांचे पंचनामे न झाल्यामुळे या ग्रामस्थांना उघड्यावरच आसरा घ्यावा लागत आहे.

संबंधित अभियंत्याला दोन वेळा लेखी पत्र देऊन विहित कालावधीत माहिती अहवाल मागविला आहे. मात्र हा अहवाल न आल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

-सखाराम मांडवगडे, तहसीलदार, जिंतूर