शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचा अहवाल सादर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र ...

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे अभियंत्यांकडून होत नसल्याने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १९ ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले. या ग्रामस्थांनी घरांचे पंचनामे करुन मदत द्यावी, यासाठी तहसील कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी निवेदने, अर्ज व तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करुन अहवाल सादर कऱण्याच्या सूचना पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला २६ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.त्यानंतर एक महिना अहवालाची वाट पाहून २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा या अभियंत्याला लेखी पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले; परंतु, या पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्याने तहसीलदारांचे दोन्ही आदेश मिळाल्यापासून दीड महिना उलटला तरीही १९ पैकी एकाही नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला नाही. तहसीलदारांना अहवालही सादर केला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच अधिकाऱ्यांनाही कामचुकार कर्मचाऱ्यांचा फटका बसत असल्याचे या प्रकरणावरुन समोर येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरुद्ध जिंतूर तहसीलदारांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिंतूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

या गावातील घरांचे नुकसान

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिंतूर तालुक्यातील ४, बोरी १. घागरा २, चारठाणा १, सोरजा १, मोहाडी १, वर्णा ८ तर रेपा येथील शेख कासम बाबामियाँ या ग्रामस्थाचे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले होते. या घटनांमध्ये घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान होऊनही घरांचे पंचनामे न झाल्यामुळे या ग्रामस्थांना उघड्यावरच आसरा घ्यावा लागत आहे.

संबंधित अभियंत्याला दोन वेळा लेखी पत्र देऊन विहित कालावधीत माहिती अहवाल मागविला आहे. मात्र हा अहवाल न आल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

-सखाराम मांडवगडे, तहसीलदार, जिंतूर