शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचा अहवाल सादर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र ...

जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे अभियंत्यांकडून होत नसल्याने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १९ ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले. या ग्रामस्थांनी घरांचे पंचनामे करुन मदत द्यावी, यासाठी तहसील कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी निवेदने, अर्ज व तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करुन अहवाल सादर कऱण्याच्या सूचना पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला २६ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.त्यानंतर एक महिना अहवालाची वाट पाहून २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा या अभियंत्याला लेखी पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले; परंतु, या पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्याने तहसीलदारांचे दोन्ही आदेश मिळाल्यापासून दीड महिना उलटला तरीही १९ पैकी एकाही नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला नाही. तहसीलदारांना अहवालही सादर केला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच अधिकाऱ्यांनाही कामचुकार कर्मचाऱ्यांचा फटका बसत असल्याचे या प्रकरणावरुन समोर येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरुद्ध जिंतूर तहसीलदारांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिंतूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

या गावातील घरांचे नुकसान

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिंतूर तालुक्यातील ४, बोरी १. घागरा २, चारठाणा १, सोरजा १, मोहाडी १, वर्णा ८ तर रेपा येथील शेख कासम बाबामियाँ या ग्रामस्थाचे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले होते. या घटनांमध्ये घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान होऊनही घरांचे पंचनामे न झाल्यामुळे या ग्रामस्थांना उघड्यावरच आसरा घ्यावा लागत आहे.

संबंधित अभियंत्याला दोन वेळा लेखी पत्र देऊन विहित कालावधीत माहिती अहवाल मागविला आहे. मात्र हा अहवाल न आल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

-सखाराम मांडवगडे, तहसीलदार, जिंतूर