शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

पुन्हा कंत्राटी तत्त्वावरच कर्मचाऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:16 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कामावरून कमी केले होते. त्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जात असून शासनाच्या या भूमिकेबद्दल कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी नोंदवली असून, कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य विभागाची पडती बाजू कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र या कामाची पावती देताना प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरी बसविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याने शासन-प्रशासन निश्चित होते; परंतु आता हा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा केवळ गरजेनुसार वापर केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी. त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी आता या कर्मचाऱ्यांनी मधून केली जात आहे.

३६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू

येथील आरोग्य विभागातील ३६५ कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केवळ ३० ते ४० कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसविले होते. आता पुन्हा या ३६५ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती दिली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलाविले जाते आणि संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांना काढून टाकणे हा प्रकार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम मधून नोकरी द्यावी तसेच आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची शासनाने दखल घेतली पाहिजे.

डॉ. सचिन कसपटे

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अनेक वेळा जोखीमही पत्कारली. मात्र शासनाकडून कोणतेही संरक्षण या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. आता पुन्हा नियुक्त्या दिल्या जात आहेत. त्या कायमस्वरूपी द्याव्यात.

राजेश राठोड

कंत्राटी स्वरूपात असतानाही आम्ही भरपूर मेहनत घेतली. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. मात्र शासनाने केलेल्या कामाची दखल घेतली नाही. आमचे काम पाहता आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे ; परंतु या कामाची दखल घेतली जात नाही. तेव्हा यावेळेस तरी कायमस्वरूपी नियुक्ती आदेश मिळावेत.

कृष्णा माने