शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पुन्हा कंत्राटी तत्त्वावरच कर्मचाऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:16 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी कामावरून कमी केले होते. त्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जात असून शासनाच्या या भूमिकेबद्दल कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी नोंदवली असून, कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य विभागाची पडती बाजू कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र या कामाची पावती देताना प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरी बसविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याने शासन-प्रशासन निश्चित होते; परंतु आता हा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा केवळ गरजेनुसार वापर केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी. त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी आता या कर्मचाऱ्यांनी मधून केली जात आहे.

३६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू

येथील आरोग्य विभागातील ३६५ कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केवळ ३० ते ४० कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसविले होते. आता पुन्हा या ३६५ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती दिली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलाविले जाते आणि संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांना काढून टाकणे हा प्रकार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम मधून नोकरी द्यावी तसेच आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची शासनाने दखल घेतली पाहिजे.

डॉ. सचिन कसपटे

कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अनेक वेळा जोखीमही पत्कारली. मात्र शासनाकडून कोणतेही संरक्षण या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. आता पुन्हा नियुक्त्या दिल्या जात आहेत. त्या कायमस्वरूपी द्याव्यात.

राजेश राठोड

कंत्राटी स्वरूपात असतानाही आम्ही भरपूर मेहनत घेतली. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. मात्र शासनाने केलेल्या कामाची दखल घेतली नाही. आमचे काम पाहता आरोग्य सेवेत कायम करणे गरजेचे आहे ; परंतु या कामाची दखल घेतली जात नाही. तेव्हा यावेळेस तरी कायमस्वरूपी नियुक्ती आदेश मिळावेत.

कृष्णा माने