शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

नियोजनच्या निधी खर्चाला पुन्हा अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

परभणी : जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाच्या हातात केवळ २४ दिवस शिल्लक आहेत. त्यातच कोरोनाचे संकट ...

परभणी : जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाच्या हातात केवळ २४ दिवस शिल्लक आहेत. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण झाल्याने हा निधी खर्च करताना अडथळे निर्माण होत असून, अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात नियोजन समितीचा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन लागले. त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली होती. डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याला तरतुदीइतका निधीही प्राप्त झाला नाही. त्यामुळे प्रायोजित केलेल्या निधीतील कामे ठप्प होती. डिसेंबर महिन्यात राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना १०० टक्के निधी वितरित केला. जानेवारी महिन्यात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा प्रशासनाने बंद केल्या आहेत. इतर व्यवहारावर सध्या कोणतेही निर्बंध नसले तरी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

नियोजन समितीचा निधी त्या त्या वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विविध विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला असला तरी ही कामे प्रस्तावित करून त्यासाठीचा निधी प्रा्‌प्त करणे आणि तो संपूर्ण निधी खर्च करण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मार्च महिन्यातील सहा दिवस उलटून गेले असून, आता अधिकाऱ्यांच्या हातात अवघे २४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नियोजनचा निधी खर्च करण्यासाठी पुन्हा अडथळे निर्माण झाले असून हा निधी खर्च होतो की नाही, अशी शंका आता उपस्थित होत आहे.

३५ कोटी रुपये वितरित

जिल्हा नियोजन समितीने २०० कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यापैकी मागील महिन्यात ३५ कोटी रुपये संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आले. त्यात थोडीफार वाढ झाली असेलही. मात्र, १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी निश्चितच अधिकाऱ्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करून त्यास मान्यता घेतल्यानंतर नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी लागणार आहे. सध्या तरी प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण संथ आहे. त्यामुळे येत्या २४ दिवसांत किती निधी खर्च होतो, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेला सवलत

जिल्हा परिषदेसाठी तरतूद केेलेला निधी पुढील वर्षातही वापरता येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी खर्च करण्यासाठी बऱ्यापैकी मुभा आहे. मात्र, इतर यंत्रणांना निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.