शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या गावात ग्रा.पं.ची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार ...

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. माजी आमदार, जि.प.चे माजी अध्यक्ष,विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महत्वपूर्ण लढती या टप्प्यात होत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत वाढणार आहे. तालुक्यातील सावंगी भांबळे या माजी आ. विजय भांबळे यांच्या गावात वर्षानुवर्षे भांबळे यांची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे हा गड भांबळे यांनी या ठिकाणी आतापर्यंत एकहाती राखला आहे. जि.प.चे विद्यमान उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या बोरी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी अजय चौधरी यांच्याकडे सत्ता होती तर यापूर्वी विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. ही ग्रामपंचायत आलटून पालटून कल देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींबरोबरच सर्वात चर्चेत असणारी ग्रामपंचायत चारठाणा आहे. तालुक्यातील दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष असते. या ठिकाणी मागच्या वेळी राकाँकडे ही ग्रामपंचायत होती. तर यापूर्वी सातत्याने १५ वर्ष बोर्डीकर गटाच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत निवडून येत होती. यावेळेच चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. राकाँचा एक मोठा गट बाजूला झाला असून, आता राकाँ, भाजपा व नाना राऊत यांचे स्वतंत्र गट झाले असल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. माजी आ. कै. कुंडलिकराव नागरे यांच्या सावळी बु. ग्रा.पं.वर बोर्डीकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळेच नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे काँग्रेसमध्ये गेल्याने ते आता सावळीमध्ये सत्तेसाठी काय चमत्कार करतात, कोणते डावपेच टाकतात, हे पहावयास मिळणार आहे.

बोरी, चारठाण्याकडे लक्ष

तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वाधिक चर्चेची, अटीतटीची व निर्णायक निवडणूक बोरी व चारठाणा येथे होणार आहे. ही दोन्ही गावे तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्याचबरोबर जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या पिंपळगाव काजळे तांडा, नमीता बुधवंत यांच्या पांगरी ग्रामपंचायतीकडेही लक्ष लागले आहे.