शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या गावात ग्रा.पं.ची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार ...

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. माजी आमदार, जि.प.चे माजी अध्यक्ष,विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महत्वपूर्ण लढती या टप्प्यात होत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत वाढणार आहे. तालुक्यातील सावंगी भांबळे या माजी आ. विजय भांबळे यांच्या गावात वर्षानुवर्षे भांबळे यांची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे हा गड भांबळे यांनी या ठिकाणी आतापर्यंत एकहाती राखला आहे. जि.प.चे विद्यमान उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या बोरी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी अजय चौधरी यांच्याकडे सत्ता होती तर यापूर्वी विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. ही ग्रामपंचायत आलटून पालटून कल देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींबरोबरच सर्वात चर्चेत असणारी ग्रामपंचायत चारठाणा आहे. तालुक्यातील दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष असते. या ठिकाणी मागच्या वेळी राकाँकडे ही ग्रामपंचायत होती. तर यापूर्वी सातत्याने १५ वर्ष बोर्डीकर गटाच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत निवडून येत होती. यावेळेच चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. राकाँचा एक मोठा गट बाजूला झाला असून, आता राकाँ, भाजपा व नाना राऊत यांचे स्वतंत्र गट झाले असल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. माजी आ. कै. कुंडलिकराव नागरे यांच्या सावळी बु. ग्रा.पं.वर बोर्डीकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळेच नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे काँग्रेसमध्ये गेल्याने ते आता सावळीमध्ये सत्तेसाठी काय चमत्कार करतात, कोणते डावपेच टाकतात, हे पहावयास मिळणार आहे.

बोरी, चारठाण्याकडे लक्ष

तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वाधिक चर्चेची, अटीतटीची व निर्णायक निवडणूक बोरी व चारठाणा येथे होणार आहे. ही दोन्ही गावे तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्याचबरोबर जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या पिंपळगाव काजळे तांडा, नमीता बुधवंत यांच्या पांगरी ग्रामपंचायतीकडेही लक्ष लागले आहे.