शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या गावात ग्रा.पं.ची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार ...

जिंतूर : तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीपैकी १०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. माजी आमदार, जि.प.चे माजी अध्यक्ष,विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महत्वपूर्ण लढती या टप्प्यात होत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत वाढणार आहे. तालुक्यातील सावंगी भांबळे या माजी आ. विजय भांबळे यांच्या गावात वर्षानुवर्षे भांबळे यांची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे हा गड भांबळे यांनी या ठिकाणी आतापर्यंत एकहाती राखला आहे. जि.प.चे विद्यमान उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या बोरी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरीकडे पाहिले जाते. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी अजय चौधरी यांच्याकडे सत्ता होती तर यापूर्वी विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. ही ग्रामपंचायत आलटून पालटून कल देणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींबरोबरच सर्वात चर्चेत असणारी ग्रामपंचायत चारठाणा आहे. तालुक्यातील दुसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष असते. या ठिकाणी मागच्या वेळी राकाँकडे ही ग्रामपंचायत होती. तर यापूर्वी सातत्याने १५ वर्ष बोर्डीकर गटाच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत निवडून येत होती. यावेळेच चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. राकाँचा एक मोठा गट बाजूला झाला असून, आता राकाँ, भाजपा व नाना राऊत यांचे स्वतंत्र गट झाले असल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. माजी आ. कै. कुंडलिकराव नागरे यांच्या सावळी बु. ग्रा.पं.वर बोर्डीकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळेच नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे काँग्रेसमध्ये गेल्याने ते आता सावळीमध्ये सत्तेसाठी काय चमत्कार करतात, कोणते डावपेच टाकतात, हे पहावयास मिळणार आहे.

बोरी, चारठाण्याकडे लक्ष

तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वाधिक चर्चेची, अटीतटीची व निर्णायक निवडणूक बोरी व चारठाणा येथे होणार आहे. ही दोन्ही गावे तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्याचबरोबर जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या पिंपळगाव काजळे तांडा, नमीता बुधवंत यांच्या पांगरी ग्रामपंचायतीकडेही लक्ष लागले आहे.