शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

५५ वाळूघाटांच्या लिलावासाठी प्रस्ताव

By admin | Updated: November 11, 2014 15:48 IST

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो.

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो. तो नकारात्मक असल्यास घाट बाद केला जातो. हिंगोली : /जिल्ह्यातील /९२ पैकी ५५ वाळूघाटांच्या वाळू उपशासाठी लिलावाची परवानगी मागणारा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून आणखी ३७ घाटांसाठी प्रक्रिया सुरू आहे.गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यानंतरही जवळपास ४१ घाटांनाच मंजुरी मिळाली होती. यातून प्रशासनाला २ कोटी ८८ लाख ६७ हजार ३३४ रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याचबरोबर अवैध उत्खनन, साठवणूक, अवैध वाहतूक आदी प्रकारातून जवळपास १५ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. यावर्षी निवडणुकीमुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे. साधारणपणे सप्टेंबरअखेरपासून ती सुरू होती. यंदा ९२ वाळूघाटांपैकी ५५ घाटांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तर आणखी ३७ घाटांची प्रक्रिया सुरू आहे. यंदा झालेले अल्पपर्जन्यमान तसेच मागीलवेळी झालेले उत्खनन आदी कारणांमुळे या घाटांची फेरतपासणी करण्यात येत आहे. यंदा मोठा पूर न आल्याचा परिणाम अनेक घाटांवर झाला आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही मंडळी गावातीलच काम असल्याचे सांगून उत्खनन करू लागली आहे.आगामी आठवडाभरात जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया प्रारंभ होईल, अशी शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केली. शिवाय उर्वरित ३७ घाटांसाठीचे प्रस्तावही आगामी दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील. /(जिल्हा प्रतिनिधी)