शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला पॉझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, एप्रिल महिन्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट २८.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, एप्रिल महिन्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट २८.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणावर परिणाम झाला असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

नवीन वर्षाला प्रारंभ झाला आणि त्यासोबतच कोरोनाचेही आगमन झाले. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. पूर्वी केलेल्या तपासण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण नोंद होण्याचे प्रमाण केवळ ४ टक्क्यांपर्यंत होते. मात्र, एप्रिल महिन्यात हे प्रमाण २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तपासणी केलेल्या नागरिकांमध्ये २८ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने हा संसर्ग किती वेगाने वाढत आहे, याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४.३ टक्के एवढे होते. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण १०.६४ टक्क्यांवर पोहोचले असून, एप्रिल महिन्यात तब्बल २८.६२ टक्के झाले आहे. एकूण तपासणी केलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाचे मात्र धांदल उडत आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही घटले आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले होते, परंतु एप्रिल महिन्यामध्ये मात्र ७४.४८ टक्के रुग्णच कोरोनामुक्त होत आहेत. एकीकडे रुग्णांचे वाढलेले प्रमाण आणि दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याची घटलेली टक्केवारी यामुळे जिल्हावासीयांच्या धास्ती वाढल्या आहेत.

२.५१ टक्के मृत्यूचे प्रमाण

कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही एप्रिल महिन्यामध्ये वाढले आहे. एप्रिल महिन्यात एकूण पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. या महिन्यांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.५१ टक्के आहे, जे राज्यात सर्वाधिक आहे. एप्रिलमध्ये रुग्ण आणि मृत्यू वाढल्याने कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.