शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विद्यापीठातील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST

बगिचातील झाडे वाळली परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या बगिचातील झाडे नियोजनाअभावी वाळली आहेत. या परिसरात अनेक शासकीय ...

बगिचातील झाडे वाळली

परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या बगिचातील झाडे नियोजनाअभावी वाळली आहेत. या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र बगिचाची देखभाल दुरुस्ती कोणी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या बगिचाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

नळ जोडणी देण्याची मोहीम सुरू

परभणी : शहरात नवीन नळ जोडणी देण्याची मोहीम सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाने नळ जोडणीची संख्या वाढावी यासाठी मालमत्ता कर आणि पाणी करात विलंब शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नळ जोडण्यांची संख्या या आठवड्यात वाढेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

बसस्थानकावर सुविधांचा अभावपरभणी : शहरातील बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासह पुरेशी आसन व्यवस्था या परिसरात उपलब्ध नाही. मागील काही महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानकाचा कारभार पाहिला जातो. प्रवाशांची संख्या वाढली असून, सुविधा मात्र कमी झाल्या आहेत. एस.टी. महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना ग्रामीण भागात मात्र अनेक मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी वाहतुकीच्या साह्याने प्रवास करावा लागत आहे. कुठे रस्ता खराब असल्याचे तर कुठे प्रवासी संख्या नसल्याचे कारण देत बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन

परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सिंचन वाढले आहे. जायकवाडी आणि दुधना प्रकल्पातून रबी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत. रबी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने रबीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खड्ड्यांमुळे वाढले अपघाताचे प्रमाण

परभणी : जिल्ह्यातील तीन्ही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. वसमत आणि गंगाखेड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून, वाहनधारकांना खड्डे चुकवित वाहने चालवावी लागतात. त्यातून छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.