शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अधिकच्या प्रवास भाड्यासह ४ हजार रुपये ग्राहकास द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

परभणी : त्रुटीची सेवा दिल्याप्रकरणी आकारण्यात आलेले अधिकचे प्रवास भाडे आणि मानसिक त्रासापोटी २ हजार व तक्रारीचा खर्च २ ...

परभणी : त्रुटीची सेवा दिल्याप्रकरणी आकारण्यात आलेले अधिकचे प्रवास भाडे आणि मानसिक त्रासापोटी २ हजार व तक्रारीचा खर्च २ हजार रुपये असे ४ हजार रुपये ४५ दिवसांच्या आत ग्राहकाला परत करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

येथील शांतीनिकेतन नगरातील पुंडलिक पांडुरंग सोनकांबळे यांनी ही तक्रार दाखल केली होती. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथून परभणीकडे जाणाऱ्या बसने (क्र.एम.एच.२२/बीई १६३२) ते प्रवास करीत होते. पुंडलिक सोनकांबळे हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांनी पॅनकार्ड दाखवून सवलतीच्या अर्ध्या तिकिटाची मागणी केली. तेव्हा वाहक ए.डी. हरकळ यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सवलतीसाठी पॅनकार्ड चालत नाही, असे म्हणून सोनकांबळे यांच्याकडून पूर्ण तिकिटाचे ३५ रुपये घेऊन तिकीट दिले. या प्रकारानंतर सोनकांबळे यांनी विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार करुन जास्तीच्या घेतलेल्या १५ रुपयांची मागणी केली. मात्र त्यांना हे पैसे परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे सोनकांबळे यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मंचामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून ग्राहक मंचाच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते, सदस्य किरण मंडोत, शेख इकबाल अहमद यांनी सोनकांबळे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक आणि वाहक ए.डी. हारकळ यांनी संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी २ हजार रुपये तसेच तक्रारीचा खर्च २ हजार रुपये आणि जास्तीचे आकारलेले प्रवास भाडे १५ रुपये ९ टक्के व्याजासह ४५ दिवसांत पुंडलिक सोनकांबळे यांना परत देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सोनकांबळे यांच्या वतीने ॲड.एन.व्ही. पिंपळगावकर यांनी काम पाहिले.