शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी ...

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले; तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासाठी आरक्षण सोडती काढण्यात आल्या.

आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील आठ गावांमध्ये सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले, त्या प्रवर्गाचे सदस्यच निवडून आले नसल्याची स्थिती आहे. सेलू तालुक्यातील राजा व आडगाव दराडे येथे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण नव्हे; परंतु, दोन्ही ठिकाणी सरपंचपद याच प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील तांदूळवाडी येथील सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे; परंतु, येथेही या पदाचा सदस्य निवडून आलेला नाही. मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथे नागरिकांच्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण सुटले आहे. परंतु, येथेही या प्रवर्गाचा उमेदवार नाही. पालम तालुक्यातील फळा, पेठशिवणी व उक्कडगाव या तीन गावांचे सरपंचपद अनुसूचित जात प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. परंतु, येथेही या प्रवर्गातील सदस्य निवडून आलेला नाही. परभणी तालुक्यातील इस्लामपूर येथे नामाप्रसाठी सरपंच आरक्षित आहे. परंतु, या प्रवर्गाचा एकही सदस्य नाही.

पालममध्ये सर्वाधिक गावे

जिल्ह्यातील एकूण आठ गावांमध्ये आरक्षण सोडतीनंतर सरपंच पदाच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. या अंतर्गत पालम तालुक्यातील फळा, पेठशिवणी व उक्कडगाव या तीन गावांचा सामवेश असून, सेलू तालुक्यातील राजा आणि आडगाव दराडे या दोन गावांचा समावेश आहे. याशिवाय परभणी तालुक्यातील इस्माईलपूर, मानवत तालुक्यातील मांडेवडगाव आणि गंगाखेड तालुक्यातील तांदूळवाडी या गावांचा यात समावेश आहे.

पुढे काय होणार?

आरक्षण सोडतीनंतर पेच निर्माण झालेल्या गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात येते. संबंधित प्रवर्गातील उमेदवार नसेल तर तसा ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. आयोगाच्या सूचनेनुसार प्रक्रिया होते.

प्रशासनाची कसरत

प्रशासनाच्या वतीने संबंधित गावांमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असली तरी संबंधित प्रवर्गातील उमेदवारच उपलब्ध नसल्याने यानिमित्त होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाची कसरत होणार आहे. शिवाय अहवाल तयार करणे व त्याची अंमलबजावणी यांतही वेळ जाणार आहे.