शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी ...

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले; तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासाठी आरक्षण सोडती काढण्यात आल्या.

आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील आठ गावांमध्ये सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले, त्या प्रवर्गाचे सदस्यच निवडून आले नसल्याची स्थिती आहे. सेलू तालुक्यातील राजा व आडगाव दराडे येथे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण नव्हे; परंतु, दोन्ही ठिकाणी सरपंचपद याच प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील तांदूळवाडी येथील सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे; परंतु, येथेही या पदाचा सदस्य निवडून आलेला नाही. मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथे नागरिकांच्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण सुटले आहे. परंतु, येथेही या प्रवर्गाचा उमेदवार नाही. पालम तालुक्यातील फळा, पेठशिवणी व उक्कडगाव या तीन गावांचे सरपंचपद अनुसूचित जात प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. परंतु, येथेही या प्रवर्गातील सदस्य निवडून आलेला नाही. परभणी तालुक्यातील इस्लामपूर येथे नामाप्रसाठी सरपंच आरक्षित आहे. परंतु, या प्रवर्गाचा एकही सदस्य नाही.

पालममध्ये सर्वाधिक गावे

जिल्ह्यातील एकूण आठ गावांमध्ये आरक्षण सोडतीनंतर सरपंच पदाच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. या अंतर्गत पालम तालुक्यातील फळा, पेठशिवणी व उक्कडगाव या तीन गावांचा सामवेश असून, सेलू तालुक्यातील राजा आणि आडगाव दराडे या दोन गावांचा समावेश आहे. याशिवाय परभणी तालुक्यातील इस्माईलपूर, मानवत तालुक्यातील मांडेवडगाव आणि गंगाखेड तालुक्यातील तांदूळवाडी या गावांचा यात समावेश आहे.

पुढे काय होणार?

आरक्षण सोडतीनंतर पेच निर्माण झालेल्या गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात येते. संबंधित प्रवर्गातील उमेदवार नसेल तर तसा ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. आयोगाच्या सूचनेनुसार प्रक्रिया होते.

प्रशासनाची कसरत

प्रशासनाच्या वतीने संबंधित गावांमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली असली तरी संबंधित प्रवर्गातील उमेदवारच उपलब्ध नसल्याने यानिमित्त होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाची कसरत होणार आहे. शिवाय अहवाल तयार करणे व त्याची अंमलबजावणी यांतही वेळ जाणार आहे.